शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये पोलीस-दिव्यांगांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:14 IST

दिव्यांगांचा तीन टक्के निधी तात्काळ वाटप करावा, या मागणीसाठी गुरूवारी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देण्याच्या कारणावरून पोलीस - आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला तर रस्त्यात थांबलेल्या आंदोलकांना आपण बााजुला थांबण्याची विनंती केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

ठळक मुद्देआंदोलन चिघळले : पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

बीड : दिव्यांगांचा तीन टक्के निधी तात्काळ वाटप करावा, या मागणीसाठी गुरूवारी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देण्याच्या कारणावरून पोलीस - आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला तर रस्त्यात थांबलेल्या आंदोलकांना आपण बााजुला थांबण्याची विनंती केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

जिल्हा व तालुका पातळीवर १८ नोव्हेंबर २०१५ अन्वये समितीची स्थापना करावी, निसमर्थ व्यक्तींच्या विविध प्रवर्गातील चार निसमर्थ सदस्य या समितीत घ्यावेत, दिव्यांगांना देण्यात येणारे मानधन एक हजार रूपये करावे, निराधार, निरश्रीत व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेंतर्गत सहभागी करून घ्यावे, यासारख्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आगोदर आंदोलकांना रस्त्यातून बाजूला होण्याची विनंती केली. परंतु आंदोलक शांत झाले नाहीत.

रस्त्यातून बाजूला घेण्याच्या कारणावरून पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी एकच गोंधळ घातला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच याबाबत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना निलंबीत करावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सहायक पोलीस निरीक्षक सतिष जाधव यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलनाची शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आलेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

संतप्त आंदोलकांकडून पोलिसांना शिवीगाळपोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलनास बसलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला घेऊन रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काही आंदोलकांनी संतप्त होत घोषणाबाजी केली.

पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यांना बाजूला घेतले असता आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु इतरांनी विनंती केल्यानंतर त्यांना खाली उतरवले. त्यानंतर मात्र त्यांनी पोलिसांनी शिवीगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले.