शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

गुन्हे उघड करण्यात राज्यात ‘बीड पोलीस’ ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:00 IST

खून, दरोडे, अत्याचार, दरोडा, यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के तपास लावला. तसेच शरीर व मालाविरूद्ध ८८.८० टक्के एवढे गुन्हे उघड करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच एकुण कामगिरीत राज्यातून पाचवा, तर मराठवाड्यात बीड पोलीस अव्वल राहिले आहेत. नुकतीच पोलीस महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खून, दरोडे, अत्याचार, दरोडा, यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के तपास लावला. तसेच शरीर व मालाविरूद्ध ८८.८० टक्के एवढे गुन्हे उघड करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच एकुण कामगिरीत राज्यातून पाचवा, तर मराठवाड्यात बीड पोलीस अव्वल राहिले आहेत. नुकतीच पोलीस महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्याकडून प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचाºयांना पाठपुरावा केला जात होता. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला.

गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरण राज्यभर गाजले. याचा तपास बीड पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात पूर्ण केला. यावेळी पो. नि. दिनेश आहेर हे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर येथे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांची नियुक्ती झाली. त्यांनी जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली.

वस्ती तपासण्याबरोबरच खून, दरोडे, चोºयांचा तपास लावण्याबरोबरच प्रतिबंधात्मक कारवायांवर जोर दिला. जिल्हा पोलीस दलाने एकत्रितपणे कामगिरी केल्यामुळेच राज्यात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात ते यशस्वी झाले आहेत. यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुख व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच हे शक्य झाल्याचे श्रीधर म्हणाले. नागरिकांनीही सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला.एमपीडीए, प्रतिबंधात्मक मध्येही प्र्रथमएमपीडीए कारवाईतही बीड जिल्हा पोलीस अव्वल आहेत. तडीपार, मोक्का कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवायातही बीड जिल्हा पोलीस दलाची कामगिरी उत्कृष्ट आहे. मागील अनेक वर्षांनी बीडने ही कामगिरी केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हा पोलीस दल नेहमीच तत्परगुन्हे उघड करण्याबरोबरच चोरीचा तपास लावून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमातून परत केला जात आहे. त्यामुळे जनतेचा पोलिसांप्रती विश्वास वाढत आहे. यापुढेही जनतेसाठी चांगले कार्य करण्यासाठी जिल्हा पोलीस दल नेहमीच तत्पर राहील.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

नागरिकांनी सहकार्य करावेवरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावणे सुरु आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया केल्या जात आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांवरही आमचा जोर आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.- घनश्याम पाळवदे,पो. नि., स्थानिक गुन्हे शाखा, बीड