शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बीड जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही झोडपले, जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी नद्या, ओढ्यांना पूर आल्याने अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने ...

बीड : जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी नद्या, ओढ्यांना पूर आल्याने अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. जिल्ह्यातील पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्रीपासून व मंगळवारी दिवसभर संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गोदावरी, सिंदफना, बिंदूसरा, सरस्वती, वाण, लेंडी, सीना, मांजरासह जवळपास सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जवळपास सर्वच धरणे भरले आहेत. गोदावरीला आलेल्या पुरामुळे गेवराई तालुक्यातील नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. गेवराई तालुक्यातील राजापूरचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. फुलसांगवी तलाव पहिल्यांदाच १०० टक्के भरला आहे. केज तालुक्यातील काचरवाडी तलावाच्या सांडव्याला झाड अडकल्याने तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. हे झाड ग्रामस्थांच्या मदतीने काढल्याने धोका टळला आहे. शिरूरकासार तालुक्यात सिंदफना नदीतील पाणीप्रवाह कमी झालेला नाही. आष्टी, पाटोदा तालुक्यांतही संततधार सुरू आहे. माजलगाव, अंबाजोगाई, वडवणी तालुके जलमय झाले आहेत. परळी-अंबाजोगाई मार्गावर नदीला पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. मंगळवारी दिवसभरात कोठेही जीवितहानीची घटना घडली नाही.