शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

प्रशासकाच्या कारभारामुळे बीड जिल्हा बॅँक तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:07 IST

: बीड जिल्हा बँकेवर लोकनिर्वाचित संचालक मंडळ असेपर्यंत बँकेची अवस्था चांगली होती. मात्र, नोव्हेंबर २०११ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आणि त्यानंतरच बँक तोट्यात गेली. संचालक असेपर्यंत कोणाच्याही ठेवी आम्ही परत दिल्या नाहीत असे झाले नाही.

ठळक मुद्देमाजी संचालक सारडा यांचा युक्तिवाद : संचालक मंडळ असेपर्यंत ठेवीदारांच्या ठेवी होत्या सुरक्षित

बीड : बीड जिल्हा बँकेवर लोकनिर्वाचित संचालक मंडळ असेपर्यंत बँकेची अवस्था चांगली होती. मात्र, नोव्हेंबर २०११ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आणि त्यानंतरच बँक तोट्यात गेली. संचालक असेपर्यंत कोणाच्याही ठेवी आम्ही परत दिल्या नाहीत असे झाले नाही. त्यामुळे आपल्यावर ठेवीदारांच्या हितांचे संरक्षण केले नाही असा आरोप करता येणार नसल्याचा दावा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा यांनी न्यायालयात केला. अंबाजोगाई साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणात दाखल गुन्ह्यातून डिस्चार्ज करण्यासाठीच्या याचिकेवर स्वत: सारडा युक्तिवाद करत आहेत.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अंबाजोगाई साखर कारखान्यास २००४ मध्ये कर्ज दिले होते. या प्रकरणात सुरुवातीला अंबाजोगाई कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर या प्रकरणात जिल्हा बँकेच्या काही संचालकांना देखील आरोपी करण्यात आले. यातून आपल्याला वगळावे अशी याचिका सुभाष सारडा आणि इतरांच्या वतीने करण्यात आली असून, यात सुभाष सारडा स्वत: युक्तिवाद करत आहेत.न्या. एस.बी. कचरे यांच्या न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना बुधवारी सुभाष सारडा यांनी, १९९७ ला आम्ही जिल्हा बँकेत संचालक म्हणून गेलो, ते २०११पर्यंत होतो, या काळात बँकेची प्रगती अक्षरश: हजार टक्क्यांनी झाली असा दावा केला. १९९७ आणि २०११ च्या बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती न्यायालयाला दिली. ९७ मध्ये ज्या बँकेचे क्लिअरिंग हाऊस बंद पडले होते, ती बँक आम्ही ११९७ कोटींवर पोहचवली, आणि सातत्याने नफ्यात ठेवली. शिवाय इतर बॅँकांमध्ये जिल्हा बॅँकेचे ४९४ कोटी रुपये डिपॉझिट होते. जिल्हा बॅँकेवर प्रशासक नियुक्त करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे पत्र नाबार्डने दिले होते. मात्र, अंतर्गत राजकारणातून या बॅँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. २०१२, २०१३, २०१४ या आर्थिक वर्षात बॅँकेला आॅडीट दर्जा ‘क’ मिळाला. त्यानंतर जिल्हा बँक पुन्हा २०१७ मध्ये लोकनिर्वाचित संचालक मंडळ येईपर्यंत तोट्यात होती. त्यामुळे संचालकांमुळे नव्हे तर प्रशासकांमुळे बँक तोट्यात गेली. आमच्या काळात कोणी ठेवी मागायला येत नव्हते, तर बँकेवर सामन्यांचा विश्वास होता. मात्र प्रशासकानेच बँकेत गोंधळ असल्याचे सांगायला आणि ठेवी वाटायला सुरुवात केली असेही सारडा म्हणाले. प्रशासकांनी सरसकट गुन्हे दाखल केले. त्यामुळे देखील जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा यावेळी सारडा यांनी केला.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रCourtन्यायालय