शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

प्रशासकाच्या कारभारामुळे बीड जिल्हा बॅँक तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:07 IST

: बीड जिल्हा बँकेवर लोकनिर्वाचित संचालक मंडळ असेपर्यंत बँकेची अवस्था चांगली होती. मात्र, नोव्हेंबर २०११ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आणि त्यानंतरच बँक तोट्यात गेली. संचालक असेपर्यंत कोणाच्याही ठेवी आम्ही परत दिल्या नाहीत असे झाले नाही.

ठळक मुद्देमाजी संचालक सारडा यांचा युक्तिवाद : संचालक मंडळ असेपर्यंत ठेवीदारांच्या ठेवी होत्या सुरक्षित

बीड : बीड जिल्हा बँकेवर लोकनिर्वाचित संचालक मंडळ असेपर्यंत बँकेची अवस्था चांगली होती. मात्र, नोव्हेंबर २०११ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आणि त्यानंतरच बँक तोट्यात गेली. संचालक असेपर्यंत कोणाच्याही ठेवी आम्ही परत दिल्या नाहीत असे झाले नाही. त्यामुळे आपल्यावर ठेवीदारांच्या हितांचे संरक्षण केले नाही असा आरोप करता येणार नसल्याचा दावा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा यांनी न्यायालयात केला. अंबाजोगाई साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणात दाखल गुन्ह्यातून डिस्चार्ज करण्यासाठीच्या याचिकेवर स्वत: सारडा युक्तिवाद करत आहेत.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अंबाजोगाई साखर कारखान्यास २००४ मध्ये कर्ज दिले होते. या प्रकरणात सुरुवातीला अंबाजोगाई कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर या प्रकरणात जिल्हा बँकेच्या काही संचालकांना देखील आरोपी करण्यात आले. यातून आपल्याला वगळावे अशी याचिका सुभाष सारडा आणि इतरांच्या वतीने करण्यात आली असून, यात सुभाष सारडा स्वत: युक्तिवाद करत आहेत.न्या. एस.बी. कचरे यांच्या न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना बुधवारी सुभाष सारडा यांनी, १९९७ ला आम्ही जिल्हा बँकेत संचालक म्हणून गेलो, ते २०११पर्यंत होतो, या काळात बँकेची प्रगती अक्षरश: हजार टक्क्यांनी झाली असा दावा केला. १९९७ आणि २०११ च्या बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती न्यायालयाला दिली. ९७ मध्ये ज्या बँकेचे क्लिअरिंग हाऊस बंद पडले होते, ती बँक आम्ही ११९७ कोटींवर पोहचवली, आणि सातत्याने नफ्यात ठेवली. शिवाय इतर बॅँकांमध्ये जिल्हा बॅँकेचे ४९४ कोटी रुपये डिपॉझिट होते. जिल्हा बॅँकेवर प्रशासक नियुक्त करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे पत्र नाबार्डने दिले होते. मात्र, अंतर्गत राजकारणातून या बॅँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. २०१२, २०१३, २०१४ या आर्थिक वर्षात बॅँकेला आॅडीट दर्जा ‘क’ मिळाला. त्यानंतर जिल्हा बँक पुन्हा २०१७ मध्ये लोकनिर्वाचित संचालक मंडळ येईपर्यंत तोट्यात होती. त्यामुळे संचालकांमुळे नव्हे तर प्रशासकांमुळे बँक तोट्यात गेली. आमच्या काळात कोणी ठेवी मागायला येत नव्हते, तर बँकेवर सामन्यांचा विश्वास होता. मात्र प्रशासकानेच बँकेत गोंधळ असल्याचे सांगायला आणि ठेवी वाटायला सुरुवात केली असेही सारडा म्हणाले. प्रशासकांनी सरसकट गुन्हे दाखल केले. त्यामुळे देखील जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा यावेळी सारडा यांनी केला.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रCourtन्यायालय