शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

छावण्यांकडे बीड जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:32 IST

जिल्ह्यात चारा छावण्याची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, छावण्यांचा यापुर्वीचा इतिहास लक्षात घेता निवडणुकीच्या काळात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे, छावणीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व योग्य प्रमाणात खाद्य दिले जाते का याच्या तपसणीसाठी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या मर्गदर्शनाखाली विविध तपाणी पथके नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देभरारी पथकाची पाहणी : सरासरी २५० ते ५०० जनावरं जास्त अहवाल तयार, कारवाई मात्र नाही

बीड : जिल्ह्यात चारा छावण्याची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, छावण्यांचा यापुर्वीचा इतिहास लक्षात घेता निवडणुकीच्या काळात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे, छावणीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व योग्य प्रमाणात खाद्य दिले जाते का याच्या तपसणीसाठी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या मर्गदर्शनाखाली विविध तपाणी पथके नेमण्यात आले आहेत. मात्र, भरारी पथकाने दिलेल्या अहवालावर अजून कारवाई झालेली नसल्यामुळे प्रशासनाचे छावण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.निवडणुकीच्या कामकाजात अनेक अधिकारी कर्मचारी व्यस्थ आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात चारा छावणी तपासणीसाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.नडे यांनी विविध छावण्यांना भेटी दिल्या व त्या ठिकाणी तापणी केली यावेळी त्यांनी तपासणी केलेल्या बहुतांश छावण्यांध्ये सरासरी २५० ते ६०० जनावरे जास्त आढळल्याची सूत्रांची माहिती आहे.याचा अहवाल दत्तप्रसाद नडे यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे दिला आहे. मात्र अजून देखील या अहवालावर कुठलीही कारवाई झालेली नसल्यामुले चारा छावण्यांच्या अनागोंदी कारभाराला अजून चालना मिळाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. याप्रकरणी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी किती छावण्यांवर कारवाई करण्यात आली याची माहिती दिली नाही. ते म्हणाले यासंदर्भात पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटीचा अहवाल वरिष्टांकडे पाठवला असून कारवाई करण्याचा निर्णय ते घेतील अशी माहिती नडे यांनी दिली.मागील महिन्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही छावण्यांना भेट देऊन प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चारा छावण्यांसंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसारच तपासणी पथक नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून छावण्यांची तपासणी देखील योग्य पद्धतीने होत आहे. मात्र त्रुटी आढळून देखील कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.नियमांची केली जात आहे पायमल्ली४पशुखाद्य म्हणून ऊस दिला जातो त्याचसोबत दर एक दिवसाआड पेंड देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक छावण्यांवर पेंड दिली जात नसल्याची माहिती आहे.४त्यामुळे जर असा प्रकार तुमच्या छावण्यांवर देखील होत असेल तर त्याची तक्रार संबंधीत तहसील कार्यालयाकडे करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच बरोबर चारा छावणी सुरु करण्यासाठी घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी अनेक छावण्यांवर करण्यात आलेली नाही त्यांचवर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र