शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बीड जिल्हा दहावीत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून बीड जिल्हा औरंगाबाद विभागात अव्वल आला आहे. मागील पाच वर्षापासून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासूनची परंपरा। औरंगाबाद विभागात जिल्ह्याचा ८१.२३ टक्के निकाल

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून बीड जिल्हा औरंगाबाद विभागात अव्वल आला आहे. मागील पाच वर्षापासून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.१ ते २२ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यात ४३ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. ३४ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.८ जून रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार बीड जिल्हा औरंगाबाद विभागात प्रथम आला असून जिल्ह्याचा निकाल ८१.२३ टक्के इतका लागला आहे.अशी आहे आकडेवारीच्जिल्ह्यातून २४ हजार ६६३ मुले व १८ हजार २९७ मुली अशा एकुण ४२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १८ हजार ९६२ मुले तर १५ हजार ९३४ मुली असे एकुण ३४ हजार ८९६ मुले-मुली उत्तीर्ण झाले आहेत. रिपीटरच्या परीक्षेतही जिल्ह्यातील १२२६ पैकी ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जास्तच्जिल्ह्यात यंदा उत्तीर्ण मुलींचे प्रमाण ८७.९० टक्के तर उत्तीर्ण मुलांचे प्रमाण ७६.८८ टक्के आहे. जिल्ह्यात पाटोदा तालुक्याचा सर्वाधिक ८७.२९ तर सर्वात कमी धारुर तालुक्याचा ७१.८४टक्के लागला आहे.पाटोदा तालुका अव्वल; धारुर सर्वात कमीपाटोदा -८७.२९शिरु रकासार-८६.४०बीड-८६.२४आष्टी-८३.८२गेवराई-८०.१५माजलगाव-७३.३२अंबाजोगाई- ७८.०७केज- ८१.२७परळी- ७६.३४धारु र-७१.८४वडवणी-८०.४९एकूण - ८१.२३

टॅग्स :BeedबीडSSC Resultदहावीचा निकाल