शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख प्रशासन निर्मितीसाठी ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बीड जिल्हा परिषदेत कार्यशाळा बीड : ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानामुळे सुधारणा व उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल, असे मत बुधवारी ...

बीड जिल्हा परिषदेत कार्यशाळा

बीड : ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानामुळे सुधारणा व उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल, असे मत बुधवारी येथील जिल्हा परिषदेच्या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील ‘सुंदर माझे कार्यालय’ या कार्यालयाच्या सर्वांगीण सुधारणांबाबतच्या अभियानाची सुरुवात उपआयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उपआयुक्त सुरेश बेदमुथा यांनी अभियानाचा उद्देश, अभियानात करावयाची स्वच्छतेची कामे, कार्यालयीन सुधारणा, लोकाभिमुख कार्यपद्धती इ. बाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार म्हणाले की, जिल्हा परिषदेत कर्मचारी कल्याण अभियान पूर्वीपासूनच राबविले जात असून, त्याद्वारे प्रलंबित कामकाजाचा निपटारा जलदगतीने करणे शक्य होत आहे, तसेच जिल्हा परिषदअंतर्गत कार्यालयांना कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या असून, सुधारणेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. ‘ सुंदर माझे कार्यालय’ अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मनापासून प्रयत्न करीन आणि लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन निर्माण होण्यासाठी त्यामुळे मदत होईल, असे ते म्हणाले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शासकीय कार्यालय हे स्वत:चे घर समजून कार्यालयात स्वच्छता राखण्याचे व चांगले कामकाज करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, दत्तात्रय गिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जटाळे, तसेच जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी आभार मानले.

लोकाभिमुख प्रशासन निर्माण करता येईल

शासकीय कर्मचारी हे त्यांच्या दैनंदिन वेळेच्या एकतृतीयांश वेळ कार्यालयात असतात. या वेळेत त्यांनी शासकीय कार्यालय हे माझे कार्यालय आहे, या भावनेने काम केल्यास कार्यालयीन कामात शिस्त, नीटनेटकेपणा येऊन कार्यालयीन सुधारणा होतील व काम करण्यास उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. अभियानाद्वारे शासकीय कार्यालयात स्वच्छता, कार्यालयीन कामकाजात आधुनिकीकरण, प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा करणे शक्य होऊन लोकाभिमुख प्रशासन निर्माण करता येईल, असा विश्वास उपायुक्त सुरेश बेदमु‌था यांनी कार्यशाळेत व्यक्त केला.