शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बीडमध्ये काका-पुतण्यातील वाद विकोपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा जिल्ह्यास पहावयास मिळाला. जि.प. आणि नगर पालिका निवडणुकीपासून बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची सुत्रे पुतण्या संदीपकडे देऊन जिल्ह्यातील नेते मंडळीनी पक्षांतर्गत चांगलीच कोंडी केल्याने आ.जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारच्या हल्लाबोल कार्यक्रमाकडेही पाठ फिरवली.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागरांची ‘हल्लाबोल’ला दांडी; अजित पवारांच्या कार्यक्रमास चौथ्यांदा गैरहजेरी

सतीश जोशीबीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा जिल्ह्यास पहावयास मिळाला. जि.प. आणि नगर पालिका निवडणुकीपासून बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची सुत्रे पुतण्या संदीपकडे देऊन जिल्ह्यातील नेते मंडळीनी पक्षांतर्गत चांगलीच कोंडी केल्याने आ.जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारच्या हल्लाबोल कार्यक्रमाकडेही पाठ फिरवली.

अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नबाब मलिक, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत तुळजापूरहून निघालेली राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा बुधवारी बीडमध्ये पोहोचली. तुळजापूरच्या कार्यक्रमास हजेरी लावलेले जयदत्त क्षीरसागर हे मात्र आपल्याच मतदारसंघातील बीडच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे मुंबईत या यात्रेच्या नियोजन बैठकीसही आ. क्षीरसागर उपस्थित होते; परंतु बीडच्या कार्यक्रमास त्यांची गैरहजेरी म्हणजे कौटुंबिक कलहाचा भाग असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने बीड येथे येऊन त्यांना बंगल्यावर चहापानास आमंत्रित केले. त्यांची ही चाल एक प्रकारे पक्षश्रेष्ठींना इशाराच होता; परंतु पक्षश्रेष्ठींनीही हल्लाबोल यात्रेचे बीडचे नियोजन पुतण्या संदीपकडे सोपवून आपला इरादा स्पष्ट केला. गेल्या सहा महिन्यांत बीड जिल्ह्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत चार कार्यक्रम झाले. या चारही कार्यक्रमांना जयदत्त क्षीरसागर यांनी गैरहजेरी लावून आपली नाराजी व्यक्त केली होती.

पुतण्या जोरातएकीकडे काका जयदत्त नाराज होऊन राष्ट्रवादी पक्षापासून दूर जात असले तरी दुसरीकडे पुतण्या संदीप मात्र उत्साहाने पक्ष आणि संघटनवाढीसाठी जोमाने कामाला लागले आहेत. जिल्हा परिषद आणि बीड नगरपालिका निवडणुकीत संदीप यांनी सरळ सरळ काकांविरुद्ध बंडखोरी केली होती. आताही आगामी बीड विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना सोबत घेत काम सुरू केले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीचे बीडमध्ये राज्यस्तरावरील झालेल्या तीन ते चार कार्यक्रमांवर संदीप यांच्या संघटन कौशल्याची छाप दिसून आली. विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, माजी आ. प्रकाश सोळंके या जिल्ह्यातील नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्याचे ‘कार्य’ चालू आहे.