शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

बीडच्या पल्स गुंतवणूकदारांना दिल्लीत आशेचा किरण; माहिती अपलोड करा-सेबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:11 IST

: पल्स पॉलीसी (पी. ए. सी. एल.) मध्ये २ हजार ५०० पर्यंतच्या गुंतवणूकदारांनी आपली मूळ कागदपत्रे स्कॅन करुन २८ फेब्रुवारीपर्यंत सेबीच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देशित केले आहे. सदर गुंतवणुकीचा परतावा सिव्हिल अपील १३३०/२०१५ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरीत करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात २ हजार ५०० रुपये गुंतवणुकीपर्यंतचे जवळपास २००० गुंतवणूकदार असून, त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पल्स पॉलीसी (पी. ए. सी. एल.) मध्ये २ हजार ५०० पर्यंतच्या गुंतवणूकदारांनी आपली मूळ कागदपत्रे स्कॅन करुन २८ फेब्रुवारीपर्यंत सेबीच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देशित केले आहे. सदर गुंतवणुकीचा परतावा सिव्हिल अपील १३३०/२०१५ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरीत करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात २ हजार ५०० रुपये गुंतवणुकीपर्यंतचे जवळपास २००० गुंतवणूकदार असून, त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रसाद शुक्ल आणि बीड जिल्ह्यातील पल्स पॉलिसी गुंतवणूदार संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांच्यात २ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील केंद्रीय वित्त मंत्रालयात चर्चा झाली. त्यानंतर हे आश्वासन देण्यात आले.बीड जिल्ह्यातील पल्स पॉलीसी गुंतवणूकदार संघर्ष समितीचे शिष्टमंडळ त्यांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून २६ डिसेंबरपासून दिल्लीत होते. समितीच्या माध्यमातून पल्सचे १०० गुंतवणूकदार सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला होता.

विविध लोकप्रतिनिधी, मंत्री व अर्थसचिवांची गुंतवणूकदारांनी भेट घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रसाद शुक्ल यांनी पल्स पॉलीसी गुंतवणूकदार संघर्ष समितीच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन भारतीय प्रतिभूती नियमन प्राधिकरणकडे तात्काळ पत्रव्यवहार करीत सदर निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. तशी अधिकृत माहिती सेबीने संकेतस्थळावरही प्रकाशित केली.

सिविल अपील १३३९४/२०१५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अमंलबजावणी करण्याची प्रक्रिया तत्काळ करण्याचे आश्वासन केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रसाद शुक्ल यांनी भारतीय प्रतिभूती नियमन प्राधिकरणच्या वतीने शिष्टमंडळाला दिले. समन्वयक कुलदीप करपे, मधुकर साळवे, सुनील जेधे, अशोक बहिरवाळ, सीमा दळवी, लक्ष्मी ओव्हाळ आदींसह गुंतवणूकदार या शिष्टमंडळात होते. या आश्वासनामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.