शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बीडच्या एआरटीओ कार्यालयात सामान्यांशी अरेरावी तर दलालांना पाहुणचार ! अधिकारी, कर्मचायांकडून दलालांना अभय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 11:47 IST

शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) विविध कामांसाठी येणा-या सर्वसामान्य व्यक्तींना कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांकडून अरेरावी करून दलालांना खुर्चीवर बसवून पाहुणचार केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी समोर आले आहे.

ठळक मुद्देकार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांकडून अरेरावी करून दलालांना खुर्चीवर बसवून पाहुणचार केला जातो यामुळे कार्यालयाची प्रतिमा मलीन होत असून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्यांची लूट राजरोसपणे खुलेआम सुरू आहे.

बीड : शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) विविध कामांसाठी येणा-या सर्वसामान्य व्यक्तींना कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांकडून अरेरावी करून दलालांना खुर्चीवर बसवून पाहुणचार केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी समोर आले आहे. यामुळे कार्यालयाची प्रतिमा मलीन होत असून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्यांची लूट राजरोसपणे खुलेआम सुरू आहे.

येथील उपप्रादेशिक कार्यालयात सध्या मनमानी कारभार सुरू आहे. अगोदरच येथील कारभार प्रभारींवर आहे. तर उपलब्ध अधिकारी, कर्मचा-यांवर वरिष्ठांचा वचक नसल्याने कामे खोळंबली आहेत. तसेच सर्वसामान्यांचे एकदा कार्यालयात येऊन कधीच काम होत नाही. कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. असे करूनही कामे करण्यास अधिकारी, कर्मचा-यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे कार्यालयातील एकही काम सर्वसामान्य व्यक्तीला करणे अवघड झाले आहे. 

प्रत्येकवेळेस येथील अधिकारी, कर्मचारी दलालांकडे बोट दाखवून कामे करून घेण्याचा मार्ग दाखवितात. हाच फायदा घेत दलालांकडून सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कार्यालयाची प्रतीमा मलीन होत चालली आहे. शिवाय कार्यालयात येऊन कामे करून घेण्यास दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांचे दुर्लक्ष होण्यास येथील अधिकारी, कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. वेळीच यावर वरिष्ठांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे. प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. नखाते यांनी भ्रमणध्वणी न घेतल्याने बाजू समजू शकली नाही.

दुजाभाव : असा चालतो कारभारसमोरच्या दरवाजाला कुलूप असते. एखाद्या प्रमाणपत्रावर अथवा इतर महत्वाच्या कागदपत्रांची माहिती अथवा स्वाक्षरी घ्यायची असेल तर मागच्या खिडकीतून बोलविले जाते. येथे तासनतास उन्हामध्ये ताटकळत उभे केले जाते. मनमानी कारभार चालवून कामे करण्यास हालगर्जीपणा केला जातो. तर दुस-या बाजूला दलाल हा फोनवरून संपर्क करून किंवा दरवाजा वाजवित कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-याला जागे करीत आत प्रवेश करतो. आलेल्या दलालाला बसण्यासाठी खुर्ची देऊन कागदपत्रांचे तात्काळ काम पूर्ण करून त्याला वाट मोकळी करून दिली जाते. बाहेर मात्र सर्वसामान्यांना अरेरावी करीत तासनतास ताटकळत ठेवले जाते.

कार्यालयात प्रभारीराजयेथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले. त्यानंतर या कार्यालयाचा पदभार औरंगाबाद उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांकडे सोपविण्यात आला. सवडीनुसार येऊन ते कारभार पाहतात. अधिकारी, कर्मचाºयांवर त्यांचा वचक राहिला नाही. प्रभारी अधिकारी असल्याचा फायदा घेत सर्वसामान्यांची सर्रास लूट सुरू असून, संताप व्यक्त होत आहे.

पुन्हा कारवाईची अपेक्षा...तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी अचानक कार्यालयाला भेट दिली होती. त्यांना येथील कारभार लक्षात येताच त्यांनी येथील दलालांची हकालपट्टी केली. परंतु अवघ्या काही दिवसात पुन्हा त्यांचे बस्तान बसले. आता पुन्हा त्याप्रमाणे कारवाईची गरज आहे. अन्यथा ही लूट दिवसेंदिवस सुरूच राहिल. या दलालांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.