शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बीडकरांना मिळणार चार दिवसांआड पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी ते नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. हाच ...

ठळक मुद्देपालिकेकडून नियोजन सुरू : २६५ लिकेज दुरुस्त करून थांबविला अपव्यय; अभियंत्यांकडून नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी ते नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. हाच धागा पकडून पालिकेने अभ्यास केला आहे. एका महिन्यात तब्बल २६५ लिकेज दुरुस्ती करुन पाणी अपव्यय थांबविण्याबरोबरच बीडकरांना चार दिवसाआड पाणी देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होणार असल्याचे पालिकेतील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. पालिकेचे हे आश्वासन कितपत खरे ठरेल? हे वेळच ठरवेल.

यावर्षी बºयापैकी पाऊस झाला. त्यामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव व बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरण तुंडूंब भरले. एवढे पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी बीडकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. मुख्य जलवाहिनीसह शहरातील अंतर्र्गत जलवाहिनीला ठिकठिकाणी लिकेज आहेत. यामुळे पाणी कमी दाबाने येण्याबरोबरच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो.

सध्या बीड शहरात हद्दवाढ भागात वेळेवर पाणी येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी येते, अशा तक्रारी आहेत. तसेच शहरातही आठ ते दहा दिवसाला पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. वाढत्या तक्रारी पाहून पालिकेने अभ्यास करून मुख्य कारणे शोधली. यामध्ये माजलगाव ते बीड, बिंदुसरा धरण ते बीड अशा मुख्य जलवाहिनीला तब्बल ४०० वर लिकेज असल्याचे समोर आले.

या लिकेजमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी बैठक घेतली आणि लिकेज दुरूस्तीचे काम हाती घेतले. गतीने काम केल्यामुळे केवळ एका महिन्यात १५ मोठ्या लिकेजसह २६५ छोटे लिकेज दुरूस्त करण्यात आले. यामुळे पाण्याचा अपव्यय थांबला आहे.हेच पाणी आता नागरिकांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सतिष दंडे, राहुल टाळके, निखील नवले, पी.आर.दुधाळ आदींनी हे नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.

पाच पर्यवेक्षकांची नियुक्तीयापूर्वी पालिकेत दहा सुपरवायझर होते. एवढे लोक असतानाही केवळ समन्वय आणि संवाद नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. परंतु आता यापैकी केवळ पाचच जण ठेवण्यात येणार असून त्यांच्याकडून पूर्ण नियोजन करून घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बीडकरांना यावर्षी तरी सुरळीत पाणीपुरवठा करावा, तसेच होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली आहे.