शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

बीडकरांना मिळणार चार दिवसांआड पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी ते नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. हाच ...

ठळक मुद्देपालिकेकडून नियोजन सुरू : २६५ लिकेज दुरुस्त करून थांबविला अपव्यय; अभियंत्यांकडून नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी ते नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. हाच धागा पकडून पालिकेने अभ्यास केला आहे. एका महिन्यात तब्बल २६५ लिकेज दुरुस्ती करुन पाणी अपव्यय थांबविण्याबरोबरच बीडकरांना चार दिवसाआड पाणी देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होणार असल्याचे पालिकेतील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. पालिकेचे हे आश्वासन कितपत खरे ठरेल? हे वेळच ठरवेल.

यावर्षी बºयापैकी पाऊस झाला. त्यामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव व बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरण तुंडूंब भरले. एवढे पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी बीडकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. मुख्य जलवाहिनीसह शहरातील अंतर्र्गत जलवाहिनीला ठिकठिकाणी लिकेज आहेत. यामुळे पाणी कमी दाबाने येण्याबरोबरच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो.

सध्या बीड शहरात हद्दवाढ भागात वेळेवर पाणी येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी येते, अशा तक्रारी आहेत. तसेच शहरातही आठ ते दहा दिवसाला पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. वाढत्या तक्रारी पाहून पालिकेने अभ्यास करून मुख्य कारणे शोधली. यामध्ये माजलगाव ते बीड, बिंदुसरा धरण ते बीड अशा मुख्य जलवाहिनीला तब्बल ४०० वर लिकेज असल्याचे समोर आले.

या लिकेजमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी बैठक घेतली आणि लिकेज दुरूस्तीचे काम हाती घेतले. गतीने काम केल्यामुळे केवळ एका महिन्यात १५ मोठ्या लिकेजसह २६५ छोटे लिकेज दुरूस्त करण्यात आले. यामुळे पाण्याचा अपव्यय थांबला आहे.हेच पाणी आता नागरिकांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सतिष दंडे, राहुल टाळके, निखील नवले, पी.आर.दुधाळ आदींनी हे नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.

पाच पर्यवेक्षकांची नियुक्तीयापूर्वी पालिकेत दहा सुपरवायझर होते. एवढे लोक असतानाही केवळ समन्वय आणि संवाद नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. परंतु आता यापैकी केवळ पाचच जण ठेवण्यात येणार असून त्यांच्याकडून पूर्ण नियोजन करून घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बीडकरांना यावर्षी तरी सुरळीत पाणीपुरवठा करावा, तसेच होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली आहे.