शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

निराधारांचे खाते उघडण्यास बँकांची टाळाटाळ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

: प्रशासनाने लक्ष देण्याची गरज अंबाजोगाई : राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या वेळकाढू धोरणांमुळे वृद्धांना नाहक त्रास होत आहे. ...

: प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

अंबाजोगाई : राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या वेळकाढू धोरणांमुळे वृद्धांना नाहक त्रास होत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या मंजूर झालेल्या नवीन लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत व इतर बँकांमध्ये खाते काढण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. बँक प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे निराधारांचे नवीन खाते उघडण्याचे काम रखडले आहे.

संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेतून केंद्र व राज्य सरकार, शेतकरी, भूमिहिन, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजार असलेल्या व्यक्तिंना महिन्याकाठी १००० रुपये पगार दिला जातो. अशा लाभार्थींची संख्या अंबाजोगाई तालुक्यात तब्बल २३ हजार १७७ आहे. दर महिन्याला १ कोटी ४० लाख रुपये विविध बँकेत जमा होतात. बँकांच्या चकरा मारून वृद्ध थकतात. परंतु पगार हाती मिळत नाही.

ज्या नवीन लाभार्थींना या विविध योजनांचा लाभ उपलब्ध झाला, अशा लाभार्थ्यांना नवीन खाते काढण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका या नवीन खातेदारांना टोलवाटोलवी करत असल्याने अजूनही त्यांचे खाते निघालेले नाही. याचा मोठा फटका निराधारांना नीमूटपणे सहन करावा लागत आहे. बँकांनी आपल्या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी. शहरात व ग्रामीण भागात अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्रीयीकृत व इतर बँका सामान्यांना नाहक त्रास देतात, अशी चर्चा खातेदारांमध्ये आहे. उर्मट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून उचित कारवाई करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.

--------

लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक बँकेला निराधारांचे नवीन खाते उघडण्याबाबत कळविले जाईल. ज्या बँका उदासीनता दर्शवतील, अशा बँकांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी पाठविण्यात येईल.

विपिन पाटील,

तहसीलदार, अंबाजोगाई.

--------

महिन्याकाठी ज्यांचे जगणे पगाराच्या भरवशावर आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हाताने काम होत नाही. सरकारकडून मिळणारा आधार तोही बँकांच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कित्येक वृद्ध निराशेच्या खाईत ढकलले जात आहेत.

-----------