शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बाळ दत्तक प्रक्रिया; मुलांपेक्षा मुलींना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:36 IST

बीड : ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही, ते ऑनलाईन नोंदणी करून बाळ दत्तक घेत आहेत. परंतु नोंदणी करूनही तीन ...

बीड : ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही, ते ऑनलाईन नोंदणी करून बाळ दत्तक घेत आहेत. परंतु नोंदणी करूनही तीन ते चार वर्षे बाळासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शिशुगृहाकडून माहिती मिळाली. आता याच अनुषंगाने बीडमध्येही पहिल्यांदाच अशी संस्था शांतीवनमध्ये उघडली आहे. या दत्तक प्रक्रियेत मुलांपेक्षा मुलींना अधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले.

अनैतिक संबंध, अत्याचार व इतर कारणांमधून जन्मलेली मुले रस्त्यावर टाकून दिली जातात, किंवा अज्ञातस्थळी सोडले जातात. ते सापडताच त्यांच्यावर उपचार करून सर्व कायदेशीर प्रक्रिया करून या मुलांना शिशुगृहात ठेवले जाते. बीडमधील मुलांना आतापर्यंत लातूर, औरंगाबाद आणि अहमदनगर येथील शिशुगृहात पाठविले जात होते. परंतु मागील काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवनात सुलभा सुरेश जोशी या नावाने शिशुगृह सुरू केले आहे. आता सर्व मुले याच शिशुगृहात ठेवली जातात. संचालक कावेरी व दीपक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काळजी घेतली जाते. यासाठी डॉक्टर, परिचारीका, काळजीवाहक, स्वयंपाकी आदी कर्मचारी कार्यरत आहेत.

दरम्यान, ज्यांना बाळ दत्तक हवे आहे, त्यांच्याकडून 'कारा.एनआयसी.इन' या संकेतस्थळावर नोंदणी केली जाते. कोणत्या राज्यातील बाळ हवे आहे, याचाही उल्लेख यात असतो. मुलगा हवा की मुलगी हे सुद्धा यात नमुदे केले जाते. नोंदणी केल्यापासून साधारण तीन ते चार वर्षे प्रतिक्षा करावी लागते. अनेकदा एवढ्या कालावधीतही बाळ मिळाले नाही, तर पुन्हा अशी प्रक्रिया करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

मुले टाकून देऊ नका

जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास २० ते ३० मुले रस्त्यावर अथवा इतर ठिकाणी टाकले जातात. परंतू ज्यांना मुल नको असेल त्यांनी ते टाकून देऊ नये. त्या बाळाची काळजी घेण्यासाठी शिशुगृह आहे. यासाठी बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठाणला संपर्क करा. त्यांच्याकडे कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर हे बाळ शिशुगृहात पाठविले जाते. परंतू त्याला रस्त्यावर फेकणे, उकिरड्यावर, नालीत टाकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी सांगितले.

अपंग बालकांचे हाल

जी बालके सदृढ आहेत, अशांना जास्त मागणी भेटते. परंतु जे अपंग, मतीमंद आहेत, त्यांना कोणीही दत्तक घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्यांचे हाल होतात. शिशुगृहात त्यांचा सांभाळ केला जातो.

त्या बालकाला स्पेनमधून मागणी

बीडमधील एका एचआयव्ही बाधित दाम्पत्याने मुलाला जन्म दिला. परंतू काही दिवसानंतर त्यांचे निधन झाले. हे बाळ एका शिशुगृहात टाकले. एचआयव्हीच्या गैरसमजामुळे त्याला कोणीच दत्तक घेत नव्हते. अखेर स्पेनमधील एका दाम्पत्याने हे बाळ दत्तक घेतल्याचे तत्तवशील कांबळे यांनी लोकमतला सांगितले.