शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

बाळ दत्तक प्रक्रिया; मुलांपेक्षा मुलींना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:36 IST

बीड : ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही, ते ऑनलाईन नोंदणी करून बाळ दत्तक घेत आहेत. परंतु नोंदणी करूनही तीन ...

बीड : ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही, ते ऑनलाईन नोंदणी करून बाळ दत्तक घेत आहेत. परंतु नोंदणी करूनही तीन ते चार वर्षे बाळासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शिशुगृहाकडून माहिती मिळाली. आता याच अनुषंगाने बीडमध्येही पहिल्यांदाच अशी संस्था शांतीवनमध्ये उघडली आहे. या दत्तक प्रक्रियेत मुलांपेक्षा मुलींना अधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले.

अनैतिक संबंध, अत्याचार व इतर कारणांमधून जन्मलेली मुले रस्त्यावर टाकून दिली जातात, किंवा अज्ञातस्थळी सोडले जातात. ते सापडताच त्यांच्यावर उपचार करून सर्व कायदेशीर प्रक्रिया करून या मुलांना शिशुगृहात ठेवले जाते. बीडमधील मुलांना आतापर्यंत लातूर, औरंगाबाद आणि अहमदनगर येथील शिशुगृहात पाठविले जात होते. परंतु मागील काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवनात सुलभा सुरेश जोशी या नावाने शिशुगृह सुरू केले आहे. आता सर्व मुले याच शिशुगृहात ठेवली जातात. संचालक कावेरी व दीपक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काळजी घेतली जाते. यासाठी डॉक्टर, परिचारीका, काळजीवाहक, स्वयंपाकी आदी कर्मचारी कार्यरत आहेत.

दरम्यान, ज्यांना बाळ दत्तक हवे आहे, त्यांच्याकडून 'कारा.एनआयसी.इन' या संकेतस्थळावर नोंदणी केली जाते. कोणत्या राज्यातील बाळ हवे आहे, याचाही उल्लेख यात असतो. मुलगा हवा की मुलगी हे सुद्धा यात नमुदे केले जाते. नोंदणी केल्यापासून साधारण तीन ते चार वर्षे प्रतिक्षा करावी लागते. अनेकदा एवढ्या कालावधीतही बाळ मिळाले नाही, तर पुन्हा अशी प्रक्रिया करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

मुले टाकून देऊ नका

जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास २० ते ३० मुले रस्त्यावर अथवा इतर ठिकाणी टाकले जातात. परंतू ज्यांना मुल नको असेल त्यांनी ते टाकून देऊ नये. त्या बाळाची काळजी घेण्यासाठी शिशुगृह आहे. यासाठी बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठाणला संपर्क करा. त्यांच्याकडे कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर हे बाळ शिशुगृहात पाठविले जाते. परंतू त्याला रस्त्यावर फेकणे, उकिरड्यावर, नालीत टाकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी सांगितले.

अपंग बालकांचे हाल

जी बालके सदृढ आहेत, अशांना जास्त मागणी भेटते. परंतु जे अपंग, मतीमंद आहेत, त्यांना कोणीही दत्तक घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्यांचे हाल होतात. शिशुगृहात त्यांचा सांभाळ केला जातो.

त्या बालकाला स्पेनमधून मागणी

बीडमधील एका एचआयव्ही बाधित दाम्पत्याने मुलाला जन्म दिला. परंतू काही दिवसानंतर त्यांचे निधन झाले. हे बाळ एका शिशुगृहात टाकले. एचआयव्हीच्या गैरसमजामुळे त्याला कोणीच दत्तक घेत नव्हते. अखेर स्पेनमधील एका दाम्पत्याने हे बाळ दत्तक घेतल्याचे तत्तवशील कांबळे यांनी लोकमतला सांगितले.