शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरच विवाह समारंभास उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : वऱ्हाडी म्हणून विवाह समारंभास उपस्थित रहायचे असेल तर उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल ...

अंबाजोगाई : वऱ्हाडी म्हणून विवाह समारंभास उपस्थित रहायचे असेल तर उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल तरच विवाह समारंभास उपस्थित राहता येईल, असा नवा नियम प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. विवाह सोहळ्यासाठी फक्त २५ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे विवाह सोहळ्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमावलीप्रमाणे विवाह समारंभास फक्त २५ जणांचीच उपस्थिती राहणार आहे. विवाह समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या त्या २५ वऱ्हाडींना संबंधित पोलीस ठाण्याकडे विवाहासाठी उपस्थित राहणाऱ्या २५ जणांची यादी द्यावी लागणार आहे. या २५ जणांनी स्वत:ची कोरोना टेस्ट केलेली असावी व त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असावा. असे २५ जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट उपस्थितांच्या यादीसोबत जोडावयाचे आहेत.

केवळ वऱ्हाडी मंडळींनाच नाही तर ज्या ठिकाणी विवाह समारंभ साजरा होणार आहे, असे मंगल कार्यालय अथवा हॉटेल्समधील तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची अँटिजन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. हॉटेल व मंगल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आपले स्वत:चे निगेटिव्ह रिपोर्ट व्यवस्थापनाकडे दाखवायचे आहेत. अशा निगेटिव्ह कर्मचाऱ्यांनाच समारंभाच्या ठिकाणी काम करता येईल. या सर्व नियमांचे पालन होते की नाही, यासाठी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन वऱ्हाडी मंडळींवर व मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनावर करडी नजर ठेवून आहेत. तसेच विवाह समारंभाच्या ठिकाणी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.