शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरच विवाह समारंभास उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : वऱ्हाडी म्हणून विवाह समारंभास उपस्थित रहायचे असेल तर उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल ...

अंबाजोगाई : वऱ्हाडी म्हणून विवाह समारंभास उपस्थित रहायचे असेल तर उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल तरच विवाह समारंभास उपस्थित राहता येईल, असा नवा नियम प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. विवाह सोहळ्यासाठी फक्त २५ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे विवाह सोहळ्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमावलीप्रमाणे विवाह समारंभास फक्त २५ जणांचीच उपस्थिती राहणार आहे. विवाह समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या त्या २५ वऱ्हाडींना संबंधित पोलीस ठाण्याकडे विवाहासाठी उपस्थित राहणाऱ्या २५ जणांची यादी द्यावी लागणार आहे. या २५ जणांनी स्वत:ची कोरोना टेस्ट केलेली असावी व त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असावा. असे २५ जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट उपस्थितांच्या यादीसोबत जोडावयाचे आहेत.

केवळ वऱ्हाडी मंडळींनाच नाही तर ज्या ठिकाणी विवाह समारंभ साजरा होणार आहे, असे मंगल कार्यालय अथवा हॉटेल्समधील तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची अँटिजन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. हॉटेल व मंगल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आपले स्वत:चे निगेटिव्ह रिपोर्ट व्यवस्थापनाकडे दाखवायचे आहेत. अशा निगेटिव्ह कर्मचाऱ्यांनाच समारंभाच्या ठिकाणी काम करता येईल. या सर्व नियमांचे पालन होते की नाही, यासाठी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन वऱ्हाडी मंडळींवर व मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनावर करडी नजर ठेवून आहेत. तसेच विवाह समारंभाच्या ठिकाणी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.