शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:39 IST

कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट होता. ही घटना सरकार प्रायोजित होती. सरकारच्या ताकदीमुळे एकबोटे, भिडेंनी ही घटना घडवून आणली, आरएसएस ही सर्वात मोठी आतंकवादी संघटना असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी केली.

ठळक मुद्देबाबूराव पोटभरेंचा डीपीडीसीचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट होता. ही घटना सरकार प्रायोजित होती. सरकारच्या ताकदीमुळे एकबोटे, भिडेंनी ही घटना घडवून आणली, आरएसएस ही सर्वात मोठी आतंकवादी संघटना असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी केली.

गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरगाव भीमा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का बसले आहेत? असा सवाल करुन पोटभरे म्हणाले, ते आरएसएसचे बाहुले आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, न्यायालयीन चौकशी करु, कसली चौकशी करताय ही तर पळवाट असल्याचा आरोप पोटभरेंनी केला. कोरेगाव भीमा येथील घटनेचे मूळ शोधून कारवाई करण्याऐवजी निषेध, आंदोलन करणाºयांवर कारवाई केली जात आहे. एकबोटे, भिडे यांच्यविरुद्ध देशद्रोहाचा तसेच राहुलच्या मृत्युमुळे खुनाचा गुन्हा दाखल करुन मकोकाअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या वेळी केली.या वेळी भीम स्वराज्य सेनेचे विकास जोगदंड, दयानंद स्वामी, विजय साळवे, प्रशांत वासनिक, राजेश साळवेसह कार्यकर्ते उपस्थित होते.सरकार जातीयवादी असल्याचा पोटभरेंचा आरोपकोरेगाव भीमा येथील घटनेचा धागा पकडत बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आपले सरकार आंबेडकरद्रोही, जातीयवादी आणि मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमविरोधी असल्यामुळे हा राजीनामा देत असल्याचे पालकमंत्र्यांना दिलेल्या राजीनामापत्रात पोटभरे यांनी स्पष्ट केले.राष्टÑीय स्वयंसेवक संघप्रणीत सत्तारुढ भाजपच्या सरकारने दिलेले कुठलेही पद स्विकारणे म्हणजे आरएसएसच्या संविधान बदलण्याच्या भूमिकेला साथ देण्यासारखे आहे. भाजपा, आरएसएसच्या जातीयवादी मानसिकतेच्या निषेधार्थ राजीनामा देत आहे. याप्रकरणी कुठलीही तडजोड करणार नाही.

पालकमंत्री सामाजिक समतेसाठी काम करत नाहीत, आजपासून नाते तुटल. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ हा राजीनामा आहे, मंत्रीपदी असतोतरी राजीनामा दिला असता. यापुढे सच्चे आंबेडकरी, शिवरायांचे अनुयायी अशा पदांना लाथ मारतील. भाजप, संघाला मदत करणाºयांना पुढची पिढी माफ करणार नाही. यापुढे भाजपविरोधात आपली राजकीय भूमिका राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजू जोगदंड यांचाही राजीनामारिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशानुसार रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनीही जिल्हा नियोजन समिती सदस्यपदाचा राजीनामा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी यावेळी जोगदंड यांनी केली आहे. यावेळी बापू पवार, किशन तांगडे, गोवर्धन वाघमारे, ज्ञानोबा माने, नुरुल खान, सिद्दीक फारोकी, संगिताताई वाघमारे, अविनाश जोगदंड, अमर विद्यागर, गोट्या वीर, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अ‍ॅड.श्रीकांत साबळे, भैय्यासाहेब मस्के, गौतम कांबळे, प्रभाकर चांदणे, दिलीप खंदारे, विलास जोगदंड, भाऊसाहेब कांबळे, सतीश शिनगारे, अंकुश गंगावणे, आनंद सरपते यासह जिल्हाभरातील रिपाइंचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.