शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मका फस्त केल्यानंतर ‘लष्करी अळी’चा हल्ला कापूस पिकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:06 IST

जिल्ह्यात महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. मात्र, मागील काही वर्षापासून कापसावर विविध संकट येत आहेत. दोन वर्षापासून सतत दुष्काळ, बोंडअळी व यावर्षी काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादर्भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन । संकट रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

बीड : जिल्ह्यात महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. मात्र, मागील काही वर्षापासून कापसावर विविध संकट येत आहेत. दोन वर्षापासून सतत दुष्काळ, बोंडअळी व यावर्षी काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादर्भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी मका पिकावर असेले लष्करी अळीचे संकट मका फस्त केल्यानंतर कापूस या पिकावर येण्याची शक्याता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना केल्यास प्रादुर्भाव कमी होऊ शकतो असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी व्यक्त केले आहे.यावर्षी ३ लाख ७७ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे. दरम्यान लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त मका या पिकावर झालेला आहे. या किडीमुळे संपूर्ण पीक धोक्यात येते व नष्ट होते. ही कीड ज्वारी व तृणधान्य वर्गीय पिकांवर असते. मात्र, अनेक ठिकाणी मका पीक हे चाºयासाठी घेतले जात असल्याने कापसाच्या तुलनेत त्याची कापणी लवकर होते. कापूस पिकाच्या तुलनेत मका हे कमी कालावधीचे पिक असल्यामुळे त्याची काढणी लवकर होते. या दोन्ही गोष्टीमुळे मुख्य खाद्य पीक नष्ट झाल्याने लष्करी अळी आपला मोर्चा परिसरातील कापूस व इतर पार्यायी पिकांवर वळवण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे दुष्काळ व नापिकीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे लष्करी अळीचे नवीन संकट उभा राहिले आहे. मात्र, लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून विविध उपाययोजना सुचवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे.या उपायायोजना कराव्यातमका पीक काढणीनंतर रोटावेटरच्या सहाय्याने मशागत करावी. त्यापुर्वी शेतातील मेटाराझीयम अनिसोप्ली अथवा नोमुरिया ५ ग्रॅम.प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. तसेच कापूस पिकावर ११.७ एस.सी.०.८ मिली. अथवा क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ एससी ०.३ प्रति लीटर पाणी या प्रमाणे त्वरित फवारणी करावी.जैविक नियंत्रण : त्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटारायझीयम अनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा नोमुरिया रिलायी ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. सध्या वातावरण जैविक बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्याने किडीचे परिणामकारक नियंत्रण मिळण्यास मदत होईल, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र