शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

आष्टी तालुक्यात १५ लघु, ६ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

अविनाश कदम आष्टी : तालुका कायम दुष्काळी समजला जातो. परंतु यंदा पर्जन्यमान ब-यापैकी झाल्याने तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर ...

अविनाश कदम

आष्टी : तालुका कायम दुष्काळी समजला जातो. परंतु यंदा पर्जन्यमान ब-यापैकी झाल्याने तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन टंचाईचा सामना करणारे नागरिक व शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. तीन महिने पावसाळा उलटूनही तालुक्यातील धरणे कोरडी ठाक होती, मात्र ३१ ऑगस्ट व ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने सर्व तलाव नदी, नाले ओव्हरफ्लो झाले. तालुक्यातील १५ लघु प्रकल्प ,६ मध्यम प्रकल्प,८ साठवण तलाव, १० बंधारे, यापैकी फक्त ३ लघु प्रकल्प व जोत्याखालील ४ प्रकल्प सोडता सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे.

तालुक्यातील आष्टी, कडा, धामणगाव,धानोरा, दौलावडगाव, टाकळसिंग, पिंपळा मंडळामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्याने बळीराजाने उसनवारी करून कोरोनासंकटात काळ्या आईची ओटी भरली पाऊस वेळेवर झाला. तर पिके ऐन फळधारणेत असताना पावसाने ओढ दिल्याने पिकांचे उत्पन्न घटले. त्यानंतर पुन्हा पिके काढणीला असताना ३१ ऑगस्टच्या रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही नदी, तलाव ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर पुन्हा ४ सप्टेंबर रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन वर्षांत कधी नव्हे एवढा पाऊस यंदा झाल्याने पाणी साठ्यात वाढ झाली. परंतु तोंडात भरवायला आलेला घास मेघराजाने हिसकावून नेला. शेतक-यांचे पीक वाहून तर काही पाण्याने सडले.

या जोरदार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्प मेहकरी ६४ टक्के, तर कडा, कडा, रुटी, तलवार, कांबळी हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. वेलतरी, पांढरी लघु तलाव, ब्रह्मगाव, किन्ही, चोभा निमगाव, वडगाव, बेलगाव, मातकुळी सिदेवाडी, बळेवाडी, सुलेमान देवळा, धामणगाव, पांढरी, जळगाव, हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसंडून वाहत आहेत. केळ, लोणी, पिंपळा, पारगाव जो. १,पारगाव जो. २, कुंठेफळ, कोयाळ, पिंपरी घुमरी येथील धरणे कोरडीठाक आहेत. या परिसरातील गावांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

चौकट

शेतकऱ्यांनी पाण्याचा जपवून वापर करावा

यावर्षी जोरदार पावसाने बऱ्यापैकी तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. १५ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पाण्याच्या आरक्षण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन निर्णय घेतला जातो. १५ ऑक्टोबरपासून कोणत्या तलावात पाणी सोडायचे हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर तलावातून पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. शेतकऱ्यांनी पाणी वापरताना जपून वापर करावा जेणेकरून यावर्षी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. देवेंद्र लोकरे, सहायक अभियंता (वर्ग १), आष्टी.