शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

आष्टी तालुक्यात १५ लघु, ६ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

अविनाश कदम आष्टी : तालुका कायम दुष्काळी समजला जातो. परंतु यंदा पर्जन्यमान ब-यापैकी झाल्याने तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर ...

अविनाश कदम

आष्टी : तालुका कायम दुष्काळी समजला जातो. परंतु यंदा पर्जन्यमान ब-यापैकी झाल्याने तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन टंचाईचा सामना करणारे नागरिक व शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. तीन महिने पावसाळा उलटूनही तालुक्यातील धरणे कोरडी ठाक होती, मात्र ३१ ऑगस्ट व ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने सर्व तलाव नदी, नाले ओव्हरफ्लो झाले. तालुक्यातील १५ लघु प्रकल्प ,६ मध्यम प्रकल्प,८ साठवण तलाव, १० बंधारे, यापैकी फक्त ३ लघु प्रकल्प व जोत्याखालील ४ प्रकल्प सोडता सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे.

तालुक्यातील आष्टी, कडा, धामणगाव,धानोरा, दौलावडगाव, टाकळसिंग, पिंपळा मंडळामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्याने बळीराजाने उसनवारी करून कोरोनासंकटात काळ्या आईची ओटी भरली पाऊस वेळेवर झाला. तर पिके ऐन फळधारणेत असताना पावसाने ओढ दिल्याने पिकांचे उत्पन्न घटले. त्यानंतर पुन्हा पिके काढणीला असताना ३१ ऑगस्टच्या रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही नदी, तलाव ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर पुन्हा ४ सप्टेंबर रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन वर्षांत कधी नव्हे एवढा पाऊस यंदा झाल्याने पाणी साठ्यात वाढ झाली. परंतु तोंडात भरवायला आलेला घास मेघराजाने हिसकावून नेला. शेतक-यांचे पीक वाहून तर काही पाण्याने सडले.

या जोरदार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्प मेहकरी ६४ टक्के, तर कडा, कडा, रुटी, तलवार, कांबळी हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. वेलतरी, पांढरी लघु तलाव, ब्रह्मगाव, किन्ही, चोभा निमगाव, वडगाव, बेलगाव, मातकुळी सिदेवाडी, बळेवाडी, सुलेमान देवळा, धामणगाव, पांढरी, जळगाव, हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसंडून वाहत आहेत. केळ, लोणी, पिंपळा, पारगाव जो. १,पारगाव जो. २, कुंठेफळ, कोयाळ, पिंपरी घुमरी येथील धरणे कोरडीठाक आहेत. या परिसरातील गावांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

चौकट

शेतकऱ्यांनी पाण्याचा जपवून वापर करावा

यावर्षी जोरदार पावसाने बऱ्यापैकी तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. १५ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पाण्याच्या आरक्षण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन निर्णय घेतला जातो. १५ ऑक्टोबरपासून कोणत्या तलावात पाणी सोडायचे हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर तलावातून पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. शेतकऱ्यांनी पाणी वापरताना जपून वापर करावा जेणेकरून यावर्षी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. देवेंद्र लोकरे, सहायक अभियंता (वर्ग १), आष्टी.