शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात १५ लघु, ६ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

अविनाश कदम आष्टी : तालुका कायम दुष्काळी समजला जातो. परंतु यंदा पर्जन्यमान ब-यापैकी झाल्याने तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर ...

अविनाश कदम

आष्टी : तालुका कायम दुष्काळी समजला जातो. परंतु यंदा पर्जन्यमान ब-यापैकी झाल्याने तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन टंचाईचा सामना करणारे नागरिक व शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. तीन महिने पावसाळा उलटूनही तालुक्यातील धरणे कोरडी ठाक होती, मात्र ३१ ऑगस्ट व ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने सर्व तलाव नदी, नाले ओव्हरफ्लो झाले. तालुक्यातील १५ लघु प्रकल्प ,६ मध्यम प्रकल्प,८ साठवण तलाव, १० बंधारे, यापैकी फक्त ३ लघु प्रकल्प व जोत्याखालील ४ प्रकल्प सोडता सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे.

तालुक्यातील आष्टी, कडा, धामणगाव,धानोरा, दौलावडगाव, टाकळसिंग, पिंपळा मंडळामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्याने बळीराजाने उसनवारी करून कोरोनासंकटात काळ्या आईची ओटी भरली पाऊस वेळेवर झाला. तर पिके ऐन फळधारणेत असताना पावसाने ओढ दिल्याने पिकांचे उत्पन्न घटले. त्यानंतर पुन्हा पिके काढणीला असताना ३१ ऑगस्टच्या रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही नदी, तलाव ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर पुन्हा ४ सप्टेंबर रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन वर्षांत कधी नव्हे एवढा पाऊस यंदा झाल्याने पाणी साठ्यात वाढ झाली. परंतु तोंडात भरवायला आलेला घास मेघराजाने हिसकावून नेला. शेतक-यांचे पीक वाहून तर काही पाण्याने सडले.

या जोरदार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्प मेहकरी ६४ टक्के, तर कडा, कडा, रुटी, तलवार, कांबळी हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. वेलतरी, पांढरी लघु तलाव, ब्रह्मगाव, किन्ही, चोभा निमगाव, वडगाव, बेलगाव, मातकुळी सिदेवाडी, बळेवाडी, सुलेमान देवळा, धामणगाव, पांढरी, जळगाव, हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसंडून वाहत आहेत. केळ, लोणी, पिंपळा, पारगाव जो. १,पारगाव जो. २, कुंठेफळ, कोयाळ, पिंपरी घुमरी येथील धरणे कोरडीठाक आहेत. या परिसरातील गावांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

चौकट

शेतकऱ्यांनी पाण्याचा जपवून वापर करावा

यावर्षी जोरदार पावसाने बऱ्यापैकी तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. १५ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पाण्याच्या आरक्षण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन निर्णय घेतला जातो. १५ ऑक्टोबरपासून कोणत्या तलावात पाणी सोडायचे हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर तलावातून पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. शेतकऱ्यांनी पाणी वापरताना जपून वापर करावा जेणेकरून यावर्षी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. देवेंद्र लोकरे, सहायक अभियंता (वर्ग १), आष्टी.