शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

थकबाकी, परमिटच्या नावाखाली वारंवार वीज वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST

परळी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला ...

परळी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला असून, वीज ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. ऐन उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह लहान बालक व वयोवृद्ध नागरिकास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वीज बिल वसुलीला सामोरे जावे लागत आहे.

वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारींचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून, वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मागील महिन्यात एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, दखल घेण्यात आली नाही. मागील काही दिवसांपासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित सेवेमुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वसुली केली जात आहे. तत्काळ अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी वीज ग्राहकाकडून होत आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबडकर म्हणाले की, यापुढे विजेचा लपंडाव होणार नाही याची काळजी घेण्यात येईल व तशा सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीवर प्रभावी उपाययोजना व नागरी सेवा पुरविण्यात परळीतील सर्व यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरली आहे. अनेक दिवसांपासून परळीकर सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे वैतागले आहेत. सुधारणा न झाल्यास वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल - ॲड. अतुल तांदळे, अध्यक्ष

परळी वैद्यनाथ विकास व जिल्हा निर्मिती समिती.

मागील एक महिन्यापासून परळी शहरातील लॉकडाऊनमुळे सगळा व्यापार बंद आहे. तरीही वीज वितरणला वीज पुरवठा सुरळीतपणे करता येत नाही. दर अर्ध्या तासाला वीज पुरवठा खंडित होतो. वीज बिल वसुलीसाठी तत्पर असणाऱ्या वीज वितरण कंपनीने वीज पुरवठाही त्याच तत्परतेने केला पाहिजे. -अश्विन मोगरकर, भाजप कार्यकर्ते,

परळी वीज वितरणच्या आधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. लोकप्रतिनधींनी लक्ष देण्याची गरज आहे. - दिलीप जोशी, वंदे मातरम् सेना, परळी.