शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी, परमिटच्या नावाखाली वारंवार वीज वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST

परळी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला ...

परळी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला असून, वीज ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. ऐन उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह लहान बालक व वयोवृद्ध नागरिकास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वीज बिल वसुलीला सामोरे जावे लागत आहे.

वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारींचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून, वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मागील महिन्यात एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, दखल घेण्यात आली नाही. मागील काही दिवसांपासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित सेवेमुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वसुली केली जात आहे. तत्काळ अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी वीज ग्राहकाकडून होत आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबडकर म्हणाले की, यापुढे विजेचा लपंडाव होणार नाही याची काळजी घेण्यात येईल व तशा सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीवर प्रभावी उपाययोजना व नागरी सेवा पुरविण्यात परळीतील सर्व यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरली आहे. अनेक दिवसांपासून परळीकर सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे वैतागले आहेत. सुधारणा न झाल्यास वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल - ॲड. अतुल तांदळे, अध्यक्ष

परळी वैद्यनाथ विकास व जिल्हा निर्मिती समिती.

मागील एक महिन्यापासून परळी शहरातील लॉकडाऊनमुळे सगळा व्यापार बंद आहे. तरीही वीज वितरणला वीज पुरवठा सुरळीतपणे करता येत नाही. दर अर्ध्या तासाला वीज पुरवठा खंडित होतो. वीज बिल वसुलीसाठी तत्पर असणाऱ्या वीज वितरण कंपनीने वीज पुरवठाही त्याच तत्परतेने केला पाहिजे. -अश्विन मोगरकर, भाजप कार्यकर्ते,

परळी वीज वितरणच्या आधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. लोकप्रतिनधींनी लक्ष देण्याची गरज आहे. - दिलीप जोशी, वंदे मातरम् सेना, परळी.