शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक, नुकसानीच्या प्रस्तावासाठी ६ पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

बीड : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर, ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून ...

बीड : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर, ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, आता यासाठी सहा विविध पर्याय तक्रार करण्यासाठी खुले करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, तक्रार ७२ तासांच्या आत करण्यासाठी दोनच पर्याय देण्यात आले होते. ॲण्ड्रॉईड मोबाइल प्रत्येक शेतकऱ्याकडे नसल्यामुळे यामध्ये बदल करून ऑफलाइन पद्धतीनेदेखील पीक नुकसानीची तक्रार स्वीकारली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. याचा विचार शासनस्तरावरून करण्यात आला असून, आता शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइन लेखी तक्रार नोंदविता येणार आहे.

आधी हे होते दोनच पर्याय

१ शेतकऱ्यांना विमा कंपनीचे ॲप डाऊनलोड करून त्यावरून पूर्ण माहिती भरून तक्रार करावी लागत होती. हा पर्यायदेखील आता खुला असणार आहे.

२ टोल फ्री क्रमांक हा दुसरा पर्याय होता. मात्र, फोन उचलला जात नसल्यामुळे यावर पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

हे आहेत सहा पर्याय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कृषी कार्यालयात करावे

शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज काढले आहे त्या बँकेतदेखील पीक नुकसानीसंदर्भात अर्ज करता येतो.

तसेच पीक विमा कंपनीच्या बीड येथील कार्यालयातदेखील तक्रार करता येते.

त्याचबरोबर पीक विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.

पीक विमा कंपनीच्या ई-मेलवरदेखील तक्रार नोंदविता येणार आहे.

पीक विमा कंपनीच्या ॲपवरदेखील तक्रार नोंदविता येते.

अतिवृष्टीचे पंचनामे सुरूच

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने सुरू आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित क्षेत्र किती आहे हे लक्षात येणार आहे. मात्र, सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या संदर्भात तक्रार कुठे व कशी करावी याविषयी कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. काही ठिकाणी ऑनलाइन तक्रारीसाठी अडचणी असतील तर, ऑफलाइन नुकसान अर्ज स्वीकारला जात आहे.

- बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी - बीड

140921\14_2_bed_11_14092021_14.jpg

गेवराई तालुक्यातील शेतातील सोयाबीन पीकाचे झालेले नुकसान