शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक, नुकसानीच्या प्रस्तावासाठी ६ पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

बीड : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर, ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून ...

बीड : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर, ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, आता यासाठी सहा विविध पर्याय तक्रार करण्यासाठी खुले करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, तक्रार ७२ तासांच्या आत करण्यासाठी दोनच पर्याय देण्यात आले होते. ॲण्ड्रॉईड मोबाइल प्रत्येक शेतकऱ्याकडे नसल्यामुळे यामध्ये बदल करून ऑफलाइन पद्धतीनेदेखील पीक नुकसानीची तक्रार स्वीकारली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. याचा विचार शासनस्तरावरून करण्यात आला असून, आता शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइन लेखी तक्रार नोंदविता येणार आहे.

आधी हे होते दोनच पर्याय

१ शेतकऱ्यांना विमा कंपनीचे ॲप डाऊनलोड करून त्यावरून पूर्ण माहिती भरून तक्रार करावी लागत होती. हा पर्यायदेखील आता खुला असणार आहे.

२ टोल फ्री क्रमांक हा दुसरा पर्याय होता. मात्र, फोन उचलला जात नसल्यामुळे यावर पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

हे आहेत सहा पर्याय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कृषी कार्यालयात करावे

शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज काढले आहे त्या बँकेतदेखील पीक नुकसानीसंदर्भात अर्ज करता येतो.

तसेच पीक विमा कंपनीच्या बीड येथील कार्यालयातदेखील तक्रार करता येते.

त्याचबरोबर पीक विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.

पीक विमा कंपनीच्या ई-मेलवरदेखील तक्रार नोंदविता येणार आहे.

पीक विमा कंपनीच्या ॲपवरदेखील तक्रार नोंदविता येते.

अतिवृष्टीचे पंचनामे सुरूच

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने सुरू आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित क्षेत्र किती आहे हे लक्षात येणार आहे. मात्र, सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या संदर्भात तक्रार कुठे व कशी करावी याविषयी कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. काही ठिकाणी ऑनलाइन तक्रारीसाठी अडचणी असतील तर, ऑफलाइन नुकसान अर्ज स्वीकारला जात आहे.

- बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी - बीड

140921\14_2_bed_11_14092021_14.jpg

गेवराई तालुक्यातील शेतातील सोयाबीन पीकाचे झालेले नुकसान