शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

मराठा समाजाला तत्काळ प्रभावाने आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:35 IST

धारूर : मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे समाजात नाराजीची भावना आहे. त्यामुळे ...

धारूर : मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे समाजात नाराजीची भावना आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्ण ताकतीने पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने कायदा करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. नाही तर मराठा समाजाला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उपोषण, धरणे व अखंड आंदोलन करावे लागेल. यास सर्वस्वी राज्य व केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा धारुर सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजावर मोठा अन्याय होऊन समाजामध्ये नैराश्य पसरले आहे. राज्य शासनाने आरक्षण दिल्यानंतर ते उच्च न्यायालयात टिकले होते. यामुळे समाजातील युवकात नवीन आशा निर्माण झाली होती. मराठा समाजाचे आरक्षण देण्याकामी मागास आयोगाचा अहवाल व सर्व पूर्तता सत्य परिस्थितीअनुसार करण्यात आली होती. परंतु, तमिळनाडू व इतर राज्यांतील आरक्षण रद्द झाले नाही व केवळ मराठा आरक्षण रद्द झाले. म्हणून निर्णयाविषयी मराठा समाजात पक्षपाताची व अन्यायाची भावना आहे. याकामी राज्य शासन व केंद्र शासन कमी पडले, अशी समाजाची भावना आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास केंद्र व राज्य शासनाची उदासीन भूमिका कारणीभूत आहे. यापूर्वी मराठा समाजाच्या ५० युवकांनी बलिदान दिले. त्यासही हेच जबाबदार आहेत. तरीही महाराष्ट्र शासनाने पूर्ण ताकतीने पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने कायदा करून मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे. नाहीतर मराठा समाजाला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उपोषण धरणे व अखंड आंदोलन करावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.

राज्य शासनाने पूर्ण पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने आवश्यक तो कायदा करून तत्काळ प्रभावाने मराठा समाजास ओबीसीमध्ये समावेश करून टिकाऊ आरक्षण द्यावे, अशी मागणी किल्लेधारुर सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

===Photopath===

100521\anil mhajan_img-20210510-wa0084_14.jpg