शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मराठा समाजाला तत्काळ प्रभावाने आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:35 IST

धारूर : मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे समाजात नाराजीची भावना आहे. त्यामुळे ...

धारूर : मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे समाजात नाराजीची भावना आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्ण ताकतीने पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने कायदा करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. नाही तर मराठा समाजाला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उपोषण, धरणे व अखंड आंदोलन करावे लागेल. यास सर्वस्वी राज्य व केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा धारुर सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजावर मोठा अन्याय होऊन समाजामध्ये नैराश्य पसरले आहे. राज्य शासनाने आरक्षण दिल्यानंतर ते उच्च न्यायालयात टिकले होते. यामुळे समाजातील युवकात नवीन आशा निर्माण झाली होती. मराठा समाजाचे आरक्षण देण्याकामी मागास आयोगाचा अहवाल व सर्व पूर्तता सत्य परिस्थितीअनुसार करण्यात आली होती. परंतु, तमिळनाडू व इतर राज्यांतील आरक्षण रद्द झाले नाही व केवळ मराठा आरक्षण रद्द झाले. म्हणून निर्णयाविषयी मराठा समाजात पक्षपाताची व अन्यायाची भावना आहे. याकामी राज्य शासन व केंद्र शासन कमी पडले, अशी समाजाची भावना आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास केंद्र व राज्य शासनाची उदासीन भूमिका कारणीभूत आहे. यापूर्वी मराठा समाजाच्या ५० युवकांनी बलिदान दिले. त्यासही हेच जबाबदार आहेत. तरीही महाराष्ट्र शासनाने पूर्ण ताकतीने पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने कायदा करून मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे. नाहीतर मराठा समाजाला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उपोषण धरणे व अखंड आंदोलन करावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.

राज्य शासनाने पूर्ण पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने आवश्यक तो कायदा करून तत्काळ प्रभावाने मराठा समाजास ओबीसीमध्ये समावेश करून टिकाऊ आरक्षण द्यावे, अशी मागणी किल्लेधारुर सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

===Photopath===

100521\anil mhajan_img-20210510-wa0084_14.jpg