शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला तत्काळ प्रभावाने आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:35 IST

धारूर : मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे समाजात नाराजीची भावना आहे. त्यामुळे ...

धारूर : मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे समाजात नाराजीची भावना आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्ण ताकतीने पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने कायदा करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. नाही तर मराठा समाजाला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उपोषण, धरणे व अखंड आंदोलन करावे लागेल. यास सर्वस्वी राज्य व केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा धारुर सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजावर मोठा अन्याय होऊन समाजामध्ये नैराश्य पसरले आहे. राज्य शासनाने आरक्षण दिल्यानंतर ते उच्च न्यायालयात टिकले होते. यामुळे समाजातील युवकात नवीन आशा निर्माण झाली होती. मराठा समाजाचे आरक्षण देण्याकामी मागास आयोगाचा अहवाल व सर्व पूर्तता सत्य परिस्थितीअनुसार करण्यात आली होती. परंतु, तमिळनाडू व इतर राज्यांतील आरक्षण रद्द झाले नाही व केवळ मराठा आरक्षण रद्द झाले. म्हणून निर्णयाविषयी मराठा समाजात पक्षपाताची व अन्यायाची भावना आहे. याकामी राज्य शासन व केंद्र शासन कमी पडले, अशी समाजाची भावना आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास केंद्र व राज्य शासनाची उदासीन भूमिका कारणीभूत आहे. यापूर्वी मराठा समाजाच्या ५० युवकांनी बलिदान दिले. त्यासही हेच जबाबदार आहेत. तरीही महाराष्ट्र शासनाने पूर्ण ताकतीने पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने कायदा करून मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे. नाहीतर मराठा समाजाला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उपोषण धरणे व अखंड आंदोलन करावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.

राज्य शासनाने पूर्ण पाठपुरावा करावा व केंद्र सरकारने आवश्यक तो कायदा करून तत्काळ प्रभावाने मराठा समाजास ओबीसीमध्ये समावेश करून टिकाऊ आरक्षण द्यावे, अशी मागणी किल्लेधारुर सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

===Photopath===

100521\anil mhajan_img-20210510-wa0084_14.jpg