शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

आवक नसल्याने सफरचंदाचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सफरचंदाची वाहतुकीद्वारे होणारी आवक थंडावल्याने सफरचंदाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १०० ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सफरचंदाची वाहतुकीद्वारे होणारी आवक थंडावल्याने सफरचंदाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १०० रुपये किलोच्या दराने विकले जाणारे सफरचंद आता १७० ते १८० रुपये किलोने ग्राहकांना मिळू लागले आहेत. लॉकडाऊनमुळे बंद असलेला बाजार व फळांची कमी होत असलेल्या आवकीमुळे सफरचंद, द्राक्षांबरोबरच इतर फळांचेही भाव मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.

खाद्यतेलात दरवाढ

अंबाजोगाई : शेंगदाणा, सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलाच्या दरात या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ११० रुपये प्रतिकिलो मिळणारे तेल आता १४५ ते १५० रुपये झाले आहे. याशिवाय गॅसचे दरही भडकले आहेत. पेट्रोलचे दरही वाढले आहेत. एकूणच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले असून, दाद मागावी तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुलांची काळजी घ्या

अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी लहान मुलांची पालकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रतिकारशक्ती सक्षम ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन करणे गरजेचे आहे, तसेच लहान मुलांना घराबाहेर पडण्यासाठी खबरदारी बाळगावी. असे आवाहन श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अनिल मस्के यांनी केले आहे.

प्रभागनुसार समित्या स्थापन करा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी व शहरी व ग्रामीण भागात नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागानुसार समिती स्थापन करणे गरजेचे आहे. समितीतील लोक नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करतील व याची पोलीस यंत्रणेला व स्थानिक प्रशासनाला याची मोठी मदत होणार आहे. यासाठी अशा समित्या स्थापन करण्यासाठी शासनाने पुढाकर घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी यांनी केली आहे.

आंबा उत्पादकांना मदत करा

अंबाजोगाई : यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे गावरान व केशर आंबा मोठ्या प्रमाणात रखडला होता. मात्र, मार्च महिन्यात सलग दोन वेळा झालेल्या गारपिटीमुळे लागलेले आंबे गळून पडले, तर अनेक ठिकाणी आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात झडल्याने आंबा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केज विधानसभा मतदारसंघात आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी भाजपाचे अनंत अरसुडे यांनी केली आहे.