शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणून अण्णांची विधानसभेत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:44 IST

जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.

ठळक मुद्देबाळासाहेब पिंगळे : अभ्यासू, शांत, संयमी, विकासदृष्टीच पर्याय

बीड : जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.शनिवारी जालना रोड भागातील माळी गल्ली, विठ्ठल मंदिर परिसरात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत बाळासाहेब पिंगळे व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर बोलत होते. यावेळी सुनील अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक शिवाजी जाधव, नवनाथ शिंदे, अशोक काळे, प्रकाश कोकाटे, कल्याण कवचट, सचिन काळे, लक्ष्मण गुंजाळ, कैलास लगड, देवा पेंढारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पिंगळे म्हणाले, शहरातील माळी नगर, विठ्ठल मंदिर परिसर हा मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून शहराचा विकास आणि शासनाच्या विविध योजना कोण पाठपुरावा करून आणू शकतो, हे सर्वांना माहीत आहे.ही विधानसभेची निवडणूक आहे आपला लोकप्रतिनिधी कोण असावा, त्याला विकासाची तळमळ आणि योग्य विचार तसेच निर्णय घेण्याची क्षमता असणारा असावा. मागील काळात या भागात रस्ते, नाल्या, पाण्याची काय परिस्थिती होती हे आपण सर्वजण जाणता.शहराचा कायापालट करण्यासाठी आण्णांसारखा चारित्र्यसंपन्न, अभ्यासू व शांत, संयमी असा योग्य पर्याय आपल्यासमोर असून त्यांना विधानसभेत आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याची आवश्यकता असल्याचे बाळासाहेब पिंगळे म्हणाले.यावेळी सुनिल अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, कैलास लगड, अशोक काळे यांनी भाषण केले. सूत्रसंचालन लक्ष्मण गुंंजाळ यांनी केले. यावेळी परिसरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, व्यापारी, महिला, पुरूष, नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधीनगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाने शहराच्या विकासासाठी न्याय दिला नाही तर शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आण्णांना मंत्रीपदाची संधी दिली. एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधी मंजूर केला.बीडच्या रेल्वेचे कामासाठी स्व.काकूंनी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन सरकाने थोडाफार निधी देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले. पण मोदींसह पालकमंत्र्यानी बीडच्या रेल्वेच्या कामाला योग्य निधी देवून कामास गती दिली.नॅशनल हायवेचे काम, अमृत अटल योजना, ड्रेनेज योजनेला निधी देवून राज्य आणि केंद्र शासनाने बीडकरांना न्याय दिला असून शहर विकासाचे काम करणाऱ्या अण्णांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विकास कामाच्या बळावर आम्ही मते मागत असून विरोधकांनी विकासाचे एक तरी काम केले का? हे त्यांनी दाखवून द्यावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना