शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणून अण्णांची विधानसभेत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:44 IST

जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.

ठळक मुद्देबाळासाहेब पिंगळे : अभ्यासू, शांत, संयमी, विकासदृष्टीच पर्याय

बीड : जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.शनिवारी जालना रोड भागातील माळी गल्ली, विठ्ठल मंदिर परिसरात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत बाळासाहेब पिंगळे व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर बोलत होते. यावेळी सुनील अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक शिवाजी जाधव, नवनाथ शिंदे, अशोक काळे, प्रकाश कोकाटे, कल्याण कवचट, सचिन काळे, लक्ष्मण गुंजाळ, कैलास लगड, देवा पेंढारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पिंगळे म्हणाले, शहरातील माळी नगर, विठ्ठल मंदिर परिसर हा मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून शहराचा विकास आणि शासनाच्या विविध योजना कोण पाठपुरावा करून आणू शकतो, हे सर्वांना माहीत आहे.ही विधानसभेची निवडणूक आहे आपला लोकप्रतिनिधी कोण असावा, त्याला विकासाची तळमळ आणि योग्य विचार तसेच निर्णय घेण्याची क्षमता असणारा असावा. मागील काळात या भागात रस्ते, नाल्या, पाण्याची काय परिस्थिती होती हे आपण सर्वजण जाणता.शहराचा कायापालट करण्यासाठी आण्णांसारखा चारित्र्यसंपन्न, अभ्यासू व शांत, संयमी असा योग्य पर्याय आपल्यासमोर असून त्यांना विधानसभेत आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याची आवश्यकता असल्याचे बाळासाहेब पिंगळे म्हणाले.यावेळी सुनिल अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, कैलास लगड, अशोक काळे यांनी भाषण केले. सूत्रसंचालन लक्ष्मण गुंंजाळ यांनी केले. यावेळी परिसरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, व्यापारी, महिला, पुरूष, नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधीनगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाने शहराच्या विकासासाठी न्याय दिला नाही तर शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आण्णांना मंत्रीपदाची संधी दिली. एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधी मंजूर केला.बीडच्या रेल्वेचे कामासाठी स्व.काकूंनी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन सरकाने थोडाफार निधी देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले. पण मोदींसह पालकमंत्र्यानी बीडच्या रेल्वेच्या कामाला योग्य निधी देवून कामास गती दिली.नॅशनल हायवेचे काम, अमृत अटल योजना, ड्रेनेज योजनेला निधी देवून राज्य आणि केंद्र शासनाने बीडकरांना न्याय दिला असून शहर विकासाचे काम करणाऱ्या अण्णांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विकास कामाच्या बळावर आम्ही मते मागत असून विरोधकांनी विकासाचे एक तरी काम केले का? हे त्यांनी दाखवून द्यावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना