शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणून अण्णांची विधानसभेत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:44 IST

जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.

ठळक मुद्देबाळासाहेब पिंगळे : अभ्यासू, शांत, संयमी, विकासदृष्टीच पर्याय

बीड : जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.शनिवारी जालना रोड भागातील माळी गल्ली, विठ्ठल मंदिर परिसरात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत बाळासाहेब पिंगळे व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर बोलत होते. यावेळी सुनील अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक शिवाजी जाधव, नवनाथ शिंदे, अशोक काळे, प्रकाश कोकाटे, कल्याण कवचट, सचिन काळे, लक्ष्मण गुंजाळ, कैलास लगड, देवा पेंढारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पिंगळे म्हणाले, शहरातील माळी नगर, विठ्ठल मंदिर परिसर हा मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून शहराचा विकास आणि शासनाच्या विविध योजना कोण पाठपुरावा करून आणू शकतो, हे सर्वांना माहीत आहे.ही विधानसभेची निवडणूक आहे आपला लोकप्रतिनिधी कोण असावा, त्याला विकासाची तळमळ आणि योग्य विचार तसेच निर्णय घेण्याची क्षमता असणारा असावा. मागील काळात या भागात रस्ते, नाल्या, पाण्याची काय परिस्थिती होती हे आपण सर्वजण जाणता.शहराचा कायापालट करण्यासाठी आण्णांसारखा चारित्र्यसंपन्न, अभ्यासू व शांत, संयमी असा योग्य पर्याय आपल्यासमोर असून त्यांना विधानसभेत आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याची आवश्यकता असल्याचे बाळासाहेब पिंगळे म्हणाले.यावेळी सुनिल अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, कैलास लगड, अशोक काळे यांनी भाषण केले. सूत्रसंचालन लक्ष्मण गुंंजाळ यांनी केले. यावेळी परिसरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, व्यापारी, महिला, पुरूष, नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधीनगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाने शहराच्या विकासासाठी न्याय दिला नाही तर शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आण्णांना मंत्रीपदाची संधी दिली. एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधी मंजूर केला.बीडच्या रेल्वेचे कामासाठी स्व.काकूंनी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन सरकाने थोडाफार निधी देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले. पण मोदींसह पालकमंत्र्यानी बीडच्या रेल्वेच्या कामाला योग्य निधी देवून कामास गती दिली.नॅशनल हायवेचे काम, अमृत अटल योजना, ड्रेनेज योजनेला निधी देवून राज्य आणि केंद्र शासनाने बीडकरांना न्याय दिला असून शहर विकासाचे काम करणाऱ्या अण्णांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विकास कामाच्या बळावर आम्ही मते मागत असून विरोधकांनी विकासाचे एक तरी काम केले का? हे त्यांनी दाखवून द्यावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना