शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे बाजार बंद; बैलजोडी खरेदीसाठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडी बाजार बंद केले होते. तसेच जनावरांचा बाजारही बंद केला होता;मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडी बाजार बंद केले होते. तसेच जनावरांचा बाजारही बंद केला होता;मात्र आता निर्बंधांत शिथिलता मिळत असल्याने बहुतांश प्रमाणात व्यवहार सुरू झाले आहेत; मात्र जनावरांचा बाजार अजूनही सुरू झाला नाही. यामुळे ऐन पेरणीच्या दिवसांत बैल खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.

सध्या पेरणीचे दिवस असल्याने बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते; मात्र कोरोनामुळे जनावरांचे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना बैल खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या दावणीला गावोगावी फिरावे लागत आहे. तर व्यापाऱ्यांना सुद्धा बैल खरेदीसाठी खेडोपाडी हिंडून वाहनांतून बैल खरेदी करून दावणीला आणून बांधावे लागत आहेत; मात्र बैलांच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या दावणीला जाऊनही ही भाववाढीमुळे खरेदी न करता रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अंबाजोगाई येथे दर मंगळवारी जनावरांचा बाजार भरत असतो. या परिसरातील व इतर तालुक्यातील शेतकरी बाजारासाठी येत असतात. या बाजारात बैल, शेळी, गाय, म्हैस जनावरांचा बाजार भरतो; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. मार्च महिन्यापासून शेतकरी नवीन बैलजोडी खरेदी करीत असतात. खरिपाच्या पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांकडे बैलच मिळत नसल्यामुळे पेरणी कशी करावी? असा प्रश्न आहे. त्यामुळे कोरोनाचा काळ कधी संपतो आणि जनावरांचा बाजार कधी भरतो. याकडे सध्या शेतकऱ्यांचे लागले आहे.

माझ्याकडे बैलजोडी नाही. त्यामुळे सध्या नवीन बैलजोडी घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दावणीकडे जात आहे; मात्र भरमसाठ किमतीमुळेही बैलजोडी घेणे परवडत नाही; मात्र आता खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बैलजोडी पाहिजे; मात्र बाजार बंद असल्यामुळे बैलजोडी मिळत नसल्याने शेतीचे काम कसे करावे? असा प्रश्न पडला आहे.

- शाम जगताप, मुडेगाव.

...

सध्या जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे खरेदी-विक्री करण्याचा व्यापार बंद आहे. खेडोपाडी जाऊन काही बैल विकत घेऊन वाहनाद्वारे आणत आहे. त्यांचा चारा, पाण्याचा खर्च दावणीला बांधून करावा लागत आहे. यामुळे खर्च वाढत आहे. बैल मिळत नसल्याने किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी दावणीला बैल खरेदी करण्याकरिता येत असला तरी भाव वाढल्यामुळे शेतकरी रिकाम्या हाताने परत जात आहेत.

- शेख बाबालाल, बैल व्यापारी.