शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे बाजार बंद; बैलजोडी खरेदीसाठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडी बाजार बंद केले होते. तसेच जनावरांचा बाजारही बंद केला होता;मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडी बाजार बंद केले होते. तसेच जनावरांचा बाजारही बंद केला होता;मात्र आता निर्बंधांत शिथिलता मिळत असल्याने बहुतांश प्रमाणात व्यवहार सुरू झाले आहेत; मात्र जनावरांचा बाजार अजूनही सुरू झाला नाही. यामुळे ऐन पेरणीच्या दिवसांत बैल खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.

सध्या पेरणीचे दिवस असल्याने बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते; मात्र कोरोनामुळे जनावरांचे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना बैल खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या दावणीला गावोगावी फिरावे लागत आहे. तर व्यापाऱ्यांना सुद्धा बैल खरेदीसाठी खेडोपाडी हिंडून वाहनांतून बैल खरेदी करून दावणीला आणून बांधावे लागत आहेत; मात्र बैलांच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या दावणीला जाऊनही ही भाववाढीमुळे खरेदी न करता रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अंबाजोगाई येथे दर मंगळवारी जनावरांचा बाजार भरत असतो. या परिसरातील व इतर तालुक्यातील शेतकरी बाजारासाठी येत असतात. या बाजारात बैल, शेळी, गाय, म्हैस जनावरांचा बाजार भरतो; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. मार्च महिन्यापासून शेतकरी नवीन बैलजोडी खरेदी करीत असतात. खरिपाच्या पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांकडे बैलच मिळत नसल्यामुळे पेरणी कशी करावी? असा प्रश्न आहे. त्यामुळे कोरोनाचा काळ कधी संपतो आणि जनावरांचा बाजार कधी भरतो. याकडे सध्या शेतकऱ्यांचे लागले आहे.

माझ्याकडे बैलजोडी नाही. त्यामुळे सध्या नवीन बैलजोडी घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दावणीकडे जात आहे; मात्र भरमसाठ किमतीमुळेही बैलजोडी घेणे परवडत नाही; मात्र आता खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बैलजोडी पाहिजे; मात्र बाजार बंद असल्यामुळे बैलजोडी मिळत नसल्याने शेतीचे काम कसे करावे? असा प्रश्न पडला आहे.

- शाम जगताप, मुडेगाव.

...

सध्या जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे खरेदी-विक्री करण्याचा व्यापार बंद आहे. खेडोपाडी जाऊन काही बैल विकत घेऊन वाहनाद्वारे आणत आहे. त्यांचा चारा, पाण्याचा खर्च दावणीला बांधून करावा लागत आहे. यामुळे खर्च वाढत आहे. बैल मिळत नसल्याने किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी दावणीला बैल खरेदी करण्याकरिता येत असला तरी भाव वाढल्यामुळे शेतकरी रिकाम्या हाताने परत जात आहेत.

- शेख बाबालाल, बैल व्यापारी.