शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

शिवजंयती संदर्भातील शासननिर्णयाबद्दल रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

बीड : शिवजयंती साजरी करताना मोजक्या लोकांनीच एकत्र यावे, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयाची ...

बीड : शिवजयंती साजरी करताना मोजक्या लोकांनीच एकत्र यावे, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयाची होळी करत विविध संघटनांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे. धुमधडाक्यात होणारे मंत्र्यांचे दौरे, सभा व विविध पक्षांचे कार्यक्रम हजारोंच्या संख्येत होतात तर, शिवजयंती कार्यक्रमासंदर्भात महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका का असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

१९ फेब्रुवारी रोजी राज्यभर जल्लोषात शिवजंयती साजरी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने शासनाने १० लोकांच्या मर्यादेत शिवजयंती साजरी करण्याचे फर्मान बजावले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मर्यादा १०० केल्याचे जाहीर केले. मात्र, या वक्तव्याचा देखील जाहीर निषेध संभाजी ब्रिगेड व इतर संघटना सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यावेळी प्रसिद्धी पत्रकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने या निर्णयाचा निषेध केला. हा निर्णय म्हणजे सर्व शिवप्रेमींच्या भावनाशी महाविकास आघाडीने केलेला खेळ असल्याची टिका संभाजी ब्रिगेडचे मा.अध्यक्ष राहुल वायकर यांनी केला आहे.

शासनाच्या दुटप्पी भूमिकेचा जाहीर निषेध

नागरिकांकडून आरोग्याची काळजी घेऊन शिवजयंती साजरी केली जाईल, मात्र, शासन निर्णय काढून मर्यादा घालणे निषेधार्य आहे. हजारोंच्या संख्येने होत असलेल्या सभा, समारंभ महाविकास आघाडींच्या नेत्यांनी घेतल्या नसत्या तर, आम्ही देखील या शासन निर्णयाचा आदर केला असता, मात्र, कायदा सर्वांसाठी सारखा आहे, याचा विसर या महाविकास आघाडी सरकारला पडला आहे.

राहुल वायकर मा.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बीड