शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राक्षसभुवनची प्राचीन मंदिरे गोदावरीच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:38 IST

तुडूंब वाहत असलेल्या या नदीचे हे रुपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

ठळक मुद्दे पाचांळेश्वर येथील आत्मतीर्थ पूर्णपणे व राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर अर्धे पाण्याखाली गेले

गेवराई (जि. बीड) : जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पाचांळेश्वर येथील आत्मतीर्थ पूर्णपणे व राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे. तुडूंब वाहत असलेल्या या नदीचे हे रुपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

पैठण येथील नाथसागर आज मितिला १०० टक्के भरल्याने उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर जलविद्युतमधून पाणी सोडले होते. परत आवक वाढल्याने रविवारी धरणाचे १६ दरवाजे अर्धा फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात १२ हजार क्युसेस पाणी सोडले होते. सध्या एकूण ६८२९ क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. 

गेल्या अनेक वर्षानंतर पैठण येथील नाथसागर आजमितिला पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरल्याने दोन दिवसांपूर्वी उजव्या, डाव्या कालव्यात व जलविद्युत केद्रातून पाणी सोडले होते. तर रविवारी रात्री नाथसागरातून १६ दरवाजे अर्धा फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात १२ हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात आला होता. तो कमी करुन मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा सोमवारी  धरणाचे १२ दरवाजे अर्धा फुटाने उघडून ५२४० क्युसेक, जलविद्युत केंद्रातून १५८९ असा एकुण ६८२९ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तसेच शनिदेवाच्या साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेल्या राक्षसभुवन येथील मंदिरातील शनि महाराज यांच्या मूर्ती अर्ध्या बुडाल्या आहेत.

३२ गावांना सावधानतेचा इशारातालुक्यातील ३२ गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात जावू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही आपत्कालिन स्थितीला सामोरे जाण्यासाठी महसूलचे पथक तयार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने भाविक भक्तांनी नदीपात्रातील पाचांळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्ता मंदिरात दर्शनाला जावू नये.- विजयकुमार गुर्जर बाबा, महंत, पांचाळेश्वर

टॅग्स :godavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरणfloodपूरBeedबीड