शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे अंबाजोगाईकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सतत होणा‌ऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे अंबाजोगाईकर त्रस्त झाले आहेत. विद्युत वाहिन्यांतील ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सतत होणा‌ऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे अंबाजोगाईकर त्रस्त झाले आहेत. विद्युत वाहिन्यांतील झालेल्या बिघाडाचे कारण पुढे दाखवत तासन्‌तास विद्युत पुरवठा ठप्प होत आहे. परिणामी छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत.

अंबाजोगाई शहरात महावितरणच्या वसुलीचे प्रमाण चोख असल्याने शहराला भारनियमनातून मुक्त ठेवले आहे. मात्र, ग्रामीण भागात भारनियमन आठ ते दहा तास कायम आहे. तरीही बिघाडाच्या नावाखाली भारनियमन व्यतिरिक्त ही तासन्तास वीजपुरवठा ठप्प राहत असल्याने छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने शहर व परिसरात अनेक विद्युत वाहिन्या निकामी झाल्या होत्या. या वाहिन्या आता दुरूस्ती झाल्या तरीही बिघाडाचे कारण पुढे करून दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार, रसवंतीगृह, संगणकाची दुकाने व छोटे व्यावसायिक यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वीज वसुलीच्या नावाखाली न पैसे भरलेल्या ग्राहकांची वीज कनेक्शन बंद करण्यासाठी जनित्रावरून वीजपुरवठा ठप्प केला जातो. याचा फटका पैसे भरणाऱ्या ग्राहकांना निमुटपणे सहन करावा लागतो. वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा महावितरणच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांनी दिला आहे.

वाहिन्यांत बिघाड, दुरुस्ती सुरू

महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय देशपांडे यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता वाहिन्यांच्या बिघाडाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्ती झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे ते म्हणाले.

---------