शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

शेतकऱ्यांच्या हितासाठी अंबाजोगाई कारखाना चालवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कारखान्याचा कारभार अतिशय काटकसरीने करीत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन आगामी काळातही कारखाना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कारखान्याचा कारभार अतिशय काटकसरीने करीत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन आगामी काळातही कारखाना चालवणार आहे, अशी माहिती अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

संचालक मंडळाने अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ साली घेण्याचे ठरविले. हंगाम सुरू करीत असताना आर्थिक अडचणी होत्या. परंतु हा कारखाना टिकावा, या उद्देशाने गेल्या वर्षीच्या हंगामात कारखाना चालू ठेवला. कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले. काम केलेल्या काळातील कामगारांचे पगारही केले. मागील वर्षी २०२०-२१ साली हा कारखाना चालू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव घेतला. परत सभासदांकडून ठेवी घेतल्या. व्यक्तिगत नावावर कर्ज ही काढले. कारखान्याच्या दुरूस्तीचे काम केले. नोव्हेंबर महिन्यात कारखाना सुरू झाला. अंदाजे हा कारखाना १०० दिवस चालला. परंतु , या १०० दिवसांमध्ये कारखान्याचे बॉयलरमध्ये सातत्याने बिघाड होऊन तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक बॉयलर पुन्हा बंद पडल्यामुळे कारखाना बंद झाला. आर्थिक नुकसान झाले. कारखान्याने १ लाख ७३ हजार मे.टन उसाचे गाळप केले. यातून १ लाख ३४ हजार क्विंटल साखर निघाली. ९ लाख लिटर स्पिरीट निघाले. याच्या विक्रीमधून जी रक्कम मिळाली त्यामधून ऊस बिलाच्या ७६ टक्के एवढी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली, असेही आडसकर यांनी सांगितले.

...

जमीन विकून शेतकऱ्यांचे पैसे दिले

उर्वरित कमी पडलेली रक्कम शासनाने थकहमी देऊन सुद्धा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिली नाही. त्यामुळे साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांची राहिलेली २४ टक्के एवढी ऊस बिलाची रक्कम देण्यात यावी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर आयुक्त व कारखान्यांकडे तगादा लावला. त्यामुळे साखर आयुक्तांनी कारखान्याची स्थावर मालमत्ता विकून उर्वरित शेतकऱ्यांची राहिलेली देणी देण्यात यावीत, असे आदेशित केले. साखर आयुक्त यांच्या आदेशानुसार कारखान्याच्या जमीन विक्रीतून जी मिळालेली रक्कम आहे. ती सर्व रक्कम शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग केली आहे, असेही रमेश आडसकर यांनी सांगितले.

....

030921\3730img-20210903-wa0066.jpg

रमेश आडसकर