शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

माजी विद्यार्थ्यांनी गजबजले अट्टल महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९७१च्या बॅचपासून ते नुकतेच २०२१मध्ये पदवी आणि पदव्युत्तर झालेले माजी विद्यार्थी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९७१च्या बॅचपासून ते नुकतेच २०२१मध्ये पदवी आणि पदव्युत्तर झालेले माजी विद्यार्थी एकत्रित आल्याने अट्टल महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी संवाद मेळाव्याला वेगळीच रंगत चढली.

प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील विविध ठिकाणी, विविध पदांवर कार्यरत असलेले शेकडो माजी विद्यार्थी आपल्या गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी र. भ. अट्टल महाविद्यालयात एकत्र आले. १९७१ सालच्या महाविद्यालय स्थापनेच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी प्रा. दादासाहेब फलके, १९७७च्या बॅचचे विद्यार्थी डॉ. राम टकले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक रणजित वाधवाणी आदींसह साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, उद्योग, शिक्षण, वैद्यकीय, स्थापत्य, कृषी, क्रीडा क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहत आपल्या आठवणींना उजाळा दिला. काही माजी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा संदेशांचे व्हिडीओ पाठवले होते, ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दाखविण्यात आले. ज्यामध्ये हिंदी - मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते नंदू माधव, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक सुधीर निकम, सुप्रसिद्ध गायिका संगीता ( जोशी ) भावसार आदींसह सिडनी, ऑस्ट्रेलिया, नागपूर, लातूर, हिमाचल प्रदेश, मुंबई आदी ठिकाणच्या माजी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या आठवणींना उजाळा दिला.

माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष ॲड. हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा माहितीपट दाखविण्यात आला. डॉ. संदीप बनसोडे यांनी निवेदन केलेला, सुदर्शन निकम यांनी माहिती संकलित केलेला हा व्हिडीओ लक्षवेधी होता. या मेळाव्याला आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असलेले प्राध्यापक गुलाबपुष्पांनी स्वागत करत होते. फोटो आणि सेल्फी पॉईंटवर फोटो काढून घेण्याची धमालही उपस्थितांनी अनुभवली. ॲड. हरिश्चंद्र पाटील यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांसाठी अकरा हजार रुपये दिले. संजय मगर यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दोन तास समुपदेशन करण्याचा संकल्प जाहीर केला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी महाविद्यालयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी राहुल कासोदे याने स्वागतगीत व गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.