शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात बर्ड फ्लूची लागण नसली तरी कोंबड्यांचे मृत्युसत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST

कडा : आष्टी तालुक्यात बर्ड फ्यूची लागण सुरू झाली असून ब्रम्हगांवसह शिरापूर येथे देखील कोंबड्या दगावल्याची घटना घडली होती. ...

कडा : आष्टी तालुक्यात बर्ड फ्यूची लागण सुरू झाली असून ब्रम्हगांवसह शिरापूर येथे देखील कोंबड्या दगावल्याची घटना घडली होती. याला प्रतिबंध घालण्यासाठी आष्टी तालुक्यातील साडेतीन लाख कोंबड्यांच्या सुरक्षेसाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तयार केली असून प्रत्येक पथकात चार लोकांचा सहभाग आहे. कुठे मृत पक्षी अथवा कोंबड्या आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाला कळविण्याचे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी केले आहे

तालुक्यात बर्ड फ्लूची लागण नसली तरी कोंबड्याचे मृत्युसत्र थांबत नसल्याने नेमक्या कोंबड्या मरतात तरी कशाने अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आष्टी तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी कार्यालयात १९ व्या पशु गणनेनुसार ३ लाख ६६ हजार ५८१ एवढी कोंबड्यांची नोंद आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले असून कोंबड्यांचे शेड देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या केलेल्या या व्यवसायाला आता कठीण दिवस आलेत. काही दिवसांपूर्वीच शेजारील पाटोदा तालुक्यात बर्ड फ्यूची लागण झाल्याने कावळ्यांचे मृत्यु झाले.

त्याच बरोबर तालुक्यातील ब्रम्हगांव, शिरापूर, सराटेवडगांव ,धानोरा, पिंपरखेड, खिळद, पाटण, केरूळ येथेही पक्ष्यांसह कोंबड्यांचा मुत्यू झाला. प्रशासनाने गंभीर दखल घेत याच धर्तीवर अशा घटना कुठे घडल्या की लगेच पाहणी व निदानासाठी पंचनामा करून पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात एक पशुधन विकास अधिकारी, तीन सहाय्यक परिचर अशी टीम सक्रिय केली आहे. पण आजवर मृत पक्षी व कोंबड्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून बर्ड फ्लूची लागण अथवा त्याने मृत्यु झालेला नसला तरी तालुक्यात कोंबड्याचे मृत्युसत्र सुरूच असल्याने व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की तालुक्यात बर्ड फ्लूची लागण झालेला अद्याप एकही अहवाल आला नसून कोंबड्यांना या दिवसात हागवण हा साथीचा रोग असून आणि कोंबड्यांना वेळेवर खाद्य मिळत नसल्याने मृत्यू होत असल्याचे त्यानी ‘लोकमत’ला सांगितले.