शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
8
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
9
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
10
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
11
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
12
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
13
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
14
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
15
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
16
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
17
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
18
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
19
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
20
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात

बदाम उतरले, तेल भडकले, कांदा महागला, बटाटा स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:30 IST

बीड : किराणा बाजारात एकीकडे सुका मेव्यात बदामाचे भाव २०० ते २५० रुपयांनी घसरले तर खाद्यतेलात मात्र तेजीची उसळी ...

बीड : किराणा बाजारात एकीकडे सुका मेव्यात बदामाचे भाव २०० ते २५० रुपयांनी घसरले तर खाद्यतेलात मात्र तेजीची उसळी सुरूच आहे. भाज्यांची समाधानकारक आवक होत असल्याने भाव आवाक्यात आहे. उन्हाळा जाणवत असल्याने फळांना मागणी वाढली आहे.

सरत्या आठवड्यात दोन दिवस घसरणीनंतर तेलाने पुन्हा उसळी मारली. तूर डाळीने शंभरी ओलांडली असून इतर डाळी मात्र स्थिर आहेत. चहा पत्तीचे वाढलेले दर कायम आहेत.

सुकामेव्याला मागणी नसल्याने बदामाचे भाव किलोमागे २५० रुपयांनी तुटले.

भाजीबाजारात दररोज आवक चांगली होत असल्याने दरांवर फारसा परिणाम झालेला नाही. पांढरा आणि लाल कांद्याचे दर किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. मेथी, पालक, करडी, शेपूला मागणी असून, दर्जानुसार भाव आहेत. शेवग्याचे भाव मागील दहा दिवसांत चांगलेच घसरले आहेत. वांगीचे भाव मात्र तेजीत आहेत. कोबीच्या दरात घसरण कायम आहे.

फळांच्या बाजारात हिरव्या आणि काळ्या द्राक्षांची आवक वाढली आहे. उन्हाळा जाणत असल्याने रसदार फळांना मागणी वाढली आहे. कलिंगड, खरबुजांची स्थानिक भागातून आवक होत आहे. केळीचे दर स्थिर असून सफरचंदाचे भाव तेजीत आहेत. लालबाग, बदाम आंब्याची आवक पुणे, मुंबईच्या बाजारातून होत आहे.

---------

सोयाबीन, सूर्यफूल तेल ५ रुपयांनी वाढले. तूरडाळ ९५ वरून १०५ रुपये किलो होती. उडद डाळीत किलोमागे ८ रुपये वाढ झाली. बदामाचा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये किलो होता. साखर, तांदूळ, खोबरे, साबुदाण्याचे भाव स्थिर होते.

-------

गवारीची शंभरी

कांदा ३०वरून ४० ते ५० रुपये किलो झाला. बटाटे २० रुपये किलोवर स्थिर आहेत. गवारने चांगलाच भाव खाल्ला असून ८० ते १०० रुपये किलो विकली. नवीन चिंचेचे भाव १०० रुपये किलो होते. मेथी, पालक, करडीची जुडी २५० रुपये, तर कोथिंबीर १५० रुपये शेकडा होती. शेवगा, दोडके, भेंडी, वांगी ४० रुपये किलो होते.

-----------

रसदारी फळांची मागणी

सफरचंदाचा भाव १५० ते १८० रुपये किलो होता. संत्रीच्या दरात १० रुपयांनी वाढ होऊन ५० रुपये किलो भाव होता. मोसंबी ६०, तर कलिंगड १० रुपये किलो होता. अंजीर १००, तर चिकू ६० रुपये किलो होते. द्राक्षांची मागणी वाढल्याने भाव ७० ते १०० रुपये किलो होता.

----

शेतातून शहरात माळवं आणण्यासाठी १०० रुपये खर्च होतो. दिवसभर बसावे लागते. जो दर मिळेल तो स्वीकारावा लागतो. आमचा नाईलाज आहे. -- परमेश्वर खोड, भाजीविक्रेता, शिरसमार्ग

---

तेलाचे दर वाढतच आहेत. बदामाचे भाव उतरले आहेत. नवा गहू येणार असल्याने भाव कमी होतील. सध्या ग्राहकी मात्र शांत आहे. - कन्हय्या सारडा, किराणा व्यापारी.

----

उन्हाळ्यामुळे कलिंगड, अनानस, द्राक्ष, खरबुजाला मागणी वाढली आहे. केळीचे भाव स्थिर आहेत. डाळिंबाची आवक नसून ग्राहक चौकशी करतात. - नबील बागवान, फळविक्रेता.