शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बदाम उतरले, तेल भडकले, कांदा महागला, बटाटा स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:30 IST

बीड : किराणा बाजारात एकीकडे सुका मेव्यात बदामाचे भाव २०० ते २५० रुपयांनी घसरले तर खाद्यतेलात मात्र तेजीची उसळी ...

बीड : किराणा बाजारात एकीकडे सुका मेव्यात बदामाचे भाव २०० ते २५० रुपयांनी घसरले तर खाद्यतेलात मात्र तेजीची उसळी सुरूच आहे. भाज्यांची समाधानकारक आवक होत असल्याने भाव आवाक्यात आहे. उन्हाळा जाणवत असल्याने फळांना मागणी वाढली आहे.

सरत्या आठवड्यात दोन दिवस घसरणीनंतर तेलाने पुन्हा उसळी मारली. तूर डाळीने शंभरी ओलांडली असून इतर डाळी मात्र स्थिर आहेत. चहा पत्तीचे वाढलेले दर कायम आहेत.

सुकामेव्याला मागणी नसल्याने बदामाचे भाव किलोमागे २५० रुपयांनी तुटले.

भाजीबाजारात दररोज आवक चांगली होत असल्याने दरांवर फारसा परिणाम झालेला नाही. पांढरा आणि लाल कांद्याचे दर किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. मेथी, पालक, करडी, शेपूला मागणी असून, दर्जानुसार भाव आहेत. शेवग्याचे भाव मागील दहा दिवसांत चांगलेच घसरले आहेत. वांगीचे भाव मात्र तेजीत आहेत. कोबीच्या दरात घसरण कायम आहे.

फळांच्या बाजारात हिरव्या आणि काळ्या द्राक्षांची आवक वाढली आहे. उन्हाळा जाणत असल्याने रसदार फळांना मागणी वाढली आहे. कलिंगड, खरबुजांची स्थानिक भागातून आवक होत आहे. केळीचे दर स्थिर असून सफरचंदाचे भाव तेजीत आहेत. लालबाग, बदाम आंब्याची आवक पुणे, मुंबईच्या बाजारातून होत आहे.

---------

सोयाबीन, सूर्यफूल तेल ५ रुपयांनी वाढले. तूरडाळ ९५ वरून १०५ रुपये किलो होती. उडद डाळीत किलोमागे ८ रुपये वाढ झाली. बदामाचा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये किलो होता. साखर, तांदूळ, खोबरे, साबुदाण्याचे भाव स्थिर होते.

-------

गवारीची शंभरी

कांदा ३०वरून ४० ते ५० रुपये किलो झाला. बटाटे २० रुपये किलोवर स्थिर आहेत. गवारने चांगलाच भाव खाल्ला असून ८० ते १०० रुपये किलो विकली. नवीन चिंचेचे भाव १०० रुपये किलो होते. मेथी, पालक, करडीची जुडी २५० रुपये, तर कोथिंबीर १५० रुपये शेकडा होती. शेवगा, दोडके, भेंडी, वांगी ४० रुपये किलो होते.

-----------

रसदारी फळांची मागणी

सफरचंदाचा भाव १५० ते १८० रुपये किलो होता. संत्रीच्या दरात १० रुपयांनी वाढ होऊन ५० रुपये किलो भाव होता. मोसंबी ६०, तर कलिंगड १० रुपये किलो होता. अंजीर १००, तर चिकू ६० रुपये किलो होते. द्राक्षांची मागणी वाढल्याने भाव ७० ते १०० रुपये किलो होता.

----

शेतातून शहरात माळवं आणण्यासाठी १०० रुपये खर्च होतो. दिवसभर बसावे लागते. जो दर मिळेल तो स्वीकारावा लागतो. आमचा नाईलाज आहे. -- परमेश्वर खोड, भाजीविक्रेता, शिरसमार्ग

---

तेलाचे दर वाढतच आहेत. बदामाचे भाव उतरले आहेत. नवा गहू येणार असल्याने भाव कमी होतील. सध्या ग्राहकी मात्र शांत आहे. - कन्हय्या सारडा, किराणा व्यापारी.

----

उन्हाळ्यामुळे कलिंगड, अनानस, द्राक्ष, खरबुजाला मागणी वाढली आहे. केळीचे भाव स्थिर आहेत. डाळिंबाची आवक नसून ग्राहक चौकशी करतात. - नबील बागवान, फळविक्रेता.