शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

मराठवाडा मुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी केलेली आंदोलने महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST

बीड : हैदराबादच्या निजामाच्या जुलमी व अन्यायी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली आंदोलनेही महत्त्वाची होती, असे ...

बीड : हैदराबादच्या निजामाच्या जुलमी व अन्यायी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली आंदोलनेही महत्त्वाची होती, असे प्रतिपादन शिक्षक नेते उत्तम पवार यांनी केले.

शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा ५६५ पैकी ५६२ संस्थाने भारतात सामील झाली. परंतु हैदराबाद, काश्मीर, जुनागड ही संस्थाने भारतात सामील झाली नाहीत. त्यावेळी मराठवाडा हा प्रांत हैदराबाद संस्थानचा एक भाग होता. हैदराबादच्या निजामाची राजवट अन्यायी होती. ती उलथवून टाकण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. मराठवाड्यात गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या लढ्याचे प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ हे होते. यामध्ये विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. काही ठिकाणी सशस्त्र आंदोलन झाल्याचे ते म्हणाले. यावेळी शाळेचे प्रशासन अधिकारी डॉ. नंदकुमार उघाडे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पवार, मुख्याध्यापक अंकुश गोरे, ज्ञानेश्वर ढोरमारे, उज्ज्वला लाखोळे, वर्षा डोळस, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.