शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST

-------- नियमांचा अडसर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने विवाह सोहळ्यांवर अनेक बंधने आली आहेत. २५ लोकांच्या ...

--------

नियमांचा अडसर

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने विवाह सोहळ्यांवर अनेक बंधने आली आहेत. २५ लोकांच्या मर्यादेत विवाह सोहळा करताना कोरोना चाचणी व निगेटिव्ह अहवालाचे बंधन आहे, तसेच पोलीस विभागाची परवानगी आवश्यक आहे. मास्क आणि सामाजिक अंतराचे बंधन आहे. लॉकडाऊन व आंतरजिल्हा, तसेच आंतरराज्य प्रवासासाठी प्रशासनाची मंजुरी आवश्यक आहे. नियमांच्या भडिमारामुळे व कारवाईच्या भीतीमुळे झंझट नको म्हणून अनेकांनी विवाह करण्याचे टाळले आहे.

----------

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

१) बंधनांमुळे अनेक कुटुंब नियमांचे पालन करीत विवाहसोहळा घरातच मोकळ्या जागेत करीत आहेत. त्यामुळे मंगल कार्यालय, मंडप, घोडे, वाजंत्री, फुलहार, आचारी, केटरिंग टाळले जात असल्याने या व्यवसायांना फटका बसला आहे.

२) दोन वर्षांपासून वापर होत नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. मात्र, त्याची देखभाल व त्यासाठी लागणारा खर्च पदरमोड करावा लागत आहे.

३) लग्नसोहळ्यांवर समाजातील विविध व्यवसाय, तसेच रोजगार अवलंबून आहेत. मात्र, या सर्वांचे गणित बिघडले आहे. जिल्ह्यात २५० खासगी व सार्वजनिक मंगल कार्यालये आहेत.

४) अनेक कुटुंबांनी नियोजन अनामत रक्कम भरून तारखा आरक्षित केल्या. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने आरक्षण केलेल्यांना त्यांची अनामत रक्कम परत देण्याची वेळ मंगल कार्यालयांच्या चालक, मालकांवर आली.

-------

माझ्या मुलीचा विवाह सोहळा २६ मे रोजी नियोजित होता. त्यादृष्टीने सर्व नियोजन केले होते; परंतु राज्यात कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे शासनाने लॉकडाऊन जारी केला. प्रशासनाचे नियम, २५ लोकांनाच परवानगी व इतर बंधनांमुळे लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलावा लागला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरच आयोजनाचा विचार आहे.

-श्रीकिसन आसाराम भक्कड, वधूपिता, बीड.

--------------

माझ्या मुलाचा विवाह १३ मे रोजी निश्चित केला होता. त्यानुसार नियोजन केले होते. व्याही मंडळी कर्नाटकमधून बीड येथे येणार होती; परंतु लॉकडाऊनमुळे आंतरराज्य परवानगी, तसेच तीन जिल्हे ओलांडून यावे लागणार असल्याने पास, तसेच इतर अडचणी होत्या. त्यामुळे तूर्त लग्न पुढे ढकलले. मंगल कार्यालय मालकाने भरलेली अनामत परत दिली.

-अमोल भांडेकर, वरपिता, बीड.