शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST

-------- नियमांचा अडसर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने विवाह सोहळ्यांवर अनेक बंधने आली आहेत. २५ लोकांच्या ...

--------

नियमांचा अडसर

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने विवाह सोहळ्यांवर अनेक बंधने आली आहेत. २५ लोकांच्या मर्यादेत विवाह सोहळा करताना कोरोना चाचणी व निगेटिव्ह अहवालाचे बंधन आहे, तसेच पोलीस विभागाची परवानगी आवश्यक आहे. मास्क आणि सामाजिक अंतराचे बंधन आहे. लॉकडाऊन व आंतरजिल्हा, तसेच आंतरराज्य प्रवासासाठी प्रशासनाची मंजुरी आवश्यक आहे. नियमांच्या भडिमारामुळे व कारवाईच्या भीतीमुळे झंझट नको म्हणून अनेकांनी विवाह करण्याचे टाळले आहे.

----------

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

१) बंधनांमुळे अनेक कुटुंब नियमांचे पालन करीत विवाहसोहळा घरातच मोकळ्या जागेत करीत आहेत. त्यामुळे मंगल कार्यालय, मंडप, घोडे, वाजंत्री, फुलहार, आचारी, केटरिंग टाळले जात असल्याने या व्यवसायांना फटका बसला आहे.

२) दोन वर्षांपासून वापर होत नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. मात्र, त्याची देखभाल व त्यासाठी लागणारा खर्च पदरमोड करावा लागत आहे.

३) लग्नसोहळ्यांवर समाजातील विविध व्यवसाय, तसेच रोजगार अवलंबून आहेत. मात्र, या सर्वांचे गणित बिघडले आहे. जिल्ह्यात २५० खासगी व सार्वजनिक मंगल कार्यालये आहेत.

४) अनेक कुटुंबांनी नियोजन अनामत रक्कम भरून तारखा आरक्षित केल्या. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने आरक्षण केलेल्यांना त्यांची अनामत रक्कम परत देण्याची वेळ मंगल कार्यालयांच्या चालक, मालकांवर आली.

-------

माझ्या मुलीचा विवाह सोहळा २६ मे रोजी नियोजित होता. त्यादृष्टीने सर्व नियोजन केले होते; परंतु राज्यात कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे शासनाने लॉकडाऊन जारी केला. प्रशासनाचे नियम, २५ लोकांनाच परवानगी व इतर बंधनांमुळे लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलावा लागला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरच आयोजनाचा विचार आहे.

-श्रीकिसन आसाराम भक्कड, वधूपिता, बीड.

--------------

माझ्या मुलाचा विवाह १३ मे रोजी निश्चित केला होता. त्यानुसार नियोजन केले होते. व्याही मंडळी कर्नाटकमधून बीड येथे येणार होती; परंतु लॉकडाऊनमुळे आंतरराज्य परवानगी, तसेच तीन जिल्हे ओलांडून यावे लागणार असल्याने पास, तसेच इतर अडचणी होत्या. त्यामुळे तूर्त लग्न पुढे ढकलले. मंगल कार्यालय मालकाने भरलेली अनामत परत दिली.

-अमोल भांडेकर, वरपिता, बीड.