शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST

-------- नियमांचा अडसर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने विवाह सोहळ्यांवर अनेक बंधने आली आहेत. २५ लोकांच्या ...

--------

नियमांचा अडसर

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने विवाह सोहळ्यांवर अनेक बंधने आली आहेत. २५ लोकांच्या मर्यादेत विवाह सोहळा करताना कोरोना चाचणी व निगेटिव्ह अहवालाचे बंधन आहे, तसेच पोलीस विभागाची परवानगी आवश्यक आहे. मास्क आणि सामाजिक अंतराचे बंधन आहे. लॉकडाऊन व आंतरजिल्हा, तसेच आंतरराज्य प्रवासासाठी प्रशासनाची मंजुरी आवश्यक आहे. नियमांच्या भडिमारामुळे व कारवाईच्या भीतीमुळे झंझट नको म्हणून अनेकांनी विवाह करण्याचे टाळले आहे.

----------

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

१) बंधनांमुळे अनेक कुटुंब नियमांचे पालन करीत विवाहसोहळा घरातच मोकळ्या जागेत करीत आहेत. त्यामुळे मंगल कार्यालय, मंडप, घोडे, वाजंत्री, फुलहार, आचारी, केटरिंग टाळले जात असल्याने या व्यवसायांना फटका बसला आहे.

२) दोन वर्षांपासून वापर होत नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. मात्र, त्याची देखभाल व त्यासाठी लागणारा खर्च पदरमोड करावा लागत आहे.

३) लग्नसोहळ्यांवर समाजातील विविध व्यवसाय, तसेच रोजगार अवलंबून आहेत. मात्र, या सर्वांचे गणित बिघडले आहे. जिल्ह्यात २५० खासगी व सार्वजनिक मंगल कार्यालये आहेत.

४) अनेक कुटुंबांनी नियोजन अनामत रक्कम भरून तारखा आरक्षित केल्या. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने आरक्षण केलेल्यांना त्यांची अनामत रक्कम परत देण्याची वेळ मंगल कार्यालयांच्या चालक, मालकांवर आली.

-------

माझ्या मुलीचा विवाह सोहळा २६ मे रोजी नियोजित होता. त्यादृष्टीने सर्व नियोजन केले होते; परंतु राज्यात कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे शासनाने लॉकडाऊन जारी केला. प्रशासनाचे नियम, २५ लोकांनाच परवानगी व इतर बंधनांमुळे लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलावा लागला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरच आयोजनाचा विचार आहे.

-श्रीकिसन आसाराम भक्कड, वधूपिता, बीड.

--------------

माझ्या मुलाचा विवाह १३ मे रोजी निश्चित केला होता. त्यानुसार नियोजन केले होते. व्याही मंडळी कर्नाटकमधून बीड येथे येणार होती; परंतु लॉकडाऊनमुळे आंतरराज्य परवानगी, तसेच तीन जिल्हे ओलांडून यावे लागणार असल्याने पास, तसेच इतर अडचणी होत्या. त्यामुळे तूर्त लग्न पुढे ढकलले. मंगल कार्यालय मालकाने भरलेली अनामत परत दिली.

-अमोल भांडेकर, वरपिता, बीड.