शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दोन तपानंतर रस्त्याचा वनवास संपतोय ; बागपिंपळगाव-तलवाडा-टाकरवण-सावरगाव रस्त्याचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST

तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - ...

तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - सावरगाव या रस्त्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. बागपिंपळगाव म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग ५२ पासून राजापूरपर्यंतचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. काही पूल व वरील एक थर बाकी आहे. यामुळे प्रवास मात्र सुसह्य झालेला आहे.

गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होती. मोठ-मोठ्या खड्ड्यांसह खडी, धूळ व दोन्ही बाजूंनी वेढलेल्या झाडांमुळे काही ठिकाणी तर पाणंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती. या भागातील ३०-४० गावांतील लोकांना प्रवास करताना मरणयातना भोगाव्या लागत होत्या. ऊस वाहतूक करणारी वाहने उलटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे यामुळे या भागात ऊस वाहतुकीस वाहने देण्यास कोणी धजावत नव्हते.

पण हायब्रीड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास दीडशे कोटी रुपये निधी मिळाल्यानंतर गतवर्षी या रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर कोरोना, पावसाळा यामुळे कामाची गती थोडी मंदावली होती. आता मात्र, या कामाला वेग आला असून बागपिंपळगावपासून राजापूरपर्यंतचा २५ कि.मी. रस्ता चांगला झाला असल्याने या मार्गावरील वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.

या परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे, खडी व धुळीचा त्रास सहन करत जीव मुठीत धरुन प्रवास करायचे, पण सध्या जवळपास २५ कि.मी. रस्ता जवळपास पूर्णत्वास असल्याने वाहनधारकांत समाधान आहे.

ऊसमालकांचा जीव भांड्यात

तालुक्यातील ही गावे गोदाकाठावरील गावे म्हणून ओळखली जातात. उसाचे पाठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावांतून अनेक कारखाने ऊस नेतात, पण रस्ता खराब असल्याने वाहने उलटल्यामुळे वाहनांसह ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. ऊस वाहन कारखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत ऊसमालकासह वाहनमालक चिंतेत असायचे. आता त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

१५ ते २० गावांची वाहतूक झाली सुसह्य

आजपर्यंतच्या झालेल्या कामाने १५-२० गावांतील वाहतूक सुसह्य झाली असून रस्ता पूर्ण झाल्यानंतर ४०-५० गावांची सोय होणार आहे.

वाहतूक वाढून रोजगाराच्या संधी

सावरगावपासून बागपिंपळगावपर्यंत रस्ता पूर्ण झाल्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, माजलगावहून जाणारी वाहने अंतर कमी होत असल्याने सावरगाव-राजेगाव-टाकरवण तलवाडामार्गे औरंगाबादकडे जातील. यामुळे या रस्त्यावर हाॅटेल, रसवंतीसह इतर व्यवसाय वाढून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.