शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

दोन तपानंतर रस्त्याचा वनवास संपतोय ; बागपिंपळगाव-तलवाडा-टाकरवण-सावरगाव रस्त्याचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST

तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - ...

तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - सावरगाव या रस्त्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. बागपिंपळगाव म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग ५२ पासून राजापूरपर्यंतचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. काही पूल व वरील एक थर बाकी आहे. यामुळे प्रवास मात्र सुसह्य झालेला आहे.

गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होती. मोठ-मोठ्या खड्ड्यांसह खडी, धूळ व दोन्ही बाजूंनी वेढलेल्या झाडांमुळे काही ठिकाणी तर पाणंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती. या भागातील ३०-४० गावांतील लोकांना प्रवास करताना मरणयातना भोगाव्या लागत होत्या. ऊस वाहतूक करणारी वाहने उलटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे यामुळे या भागात ऊस वाहतुकीस वाहने देण्यास कोणी धजावत नव्हते.

पण हायब्रीड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास दीडशे कोटी रुपये निधी मिळाल्यानंतर गतवर्षी या रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर कोरोना, पावसाळा यामुळे कामाची गती थोडी मंदावली होती. आता मात्र, या कामाला वेग आला असून बागपिंपळगावपासून राजापूरपर्यंतचा २५ कि.मी. रस्ता चांगला झाला असल्याने या मार्गावरील वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.

या परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे, खडी व धुळीचा त्रास सहन करत जीव मुठीत धरुन प्रवास करायचे, पण सध्या जवळपास २५ कि.मी. रस्ता जवळपास पूर्णत्वास असल्याने वाहनधारकांत समाधान आहे.

ऊसमालकांचा जीव भांड्यात

तालुक्यातील ही गावे गोदाकाठावरील गावे म्हणून ओळखली जातात. उसाचे पाठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावांतून अनेक कारखाने ऊस नेतात, पण रस्ता खराब असल्याने वाहने उलटल्यामुळे वाहनांसह ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. ऊस वाहन कारखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत ऊसमालकासह वाहनमालक चिंतेत असायचे. आता त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

१५ ते २० गावांची वाहतूक झाली सुसह्य

आजपर्यंतच्या झालेल्या कामाने १५-२० गावांतील वाहतूक सुसह्य झाली असून रस्ता पूर्ण झाल्यानंतर ४०-५० गावांची सोय होणार आहे.

वाहतूक वाढून रोजगाराच्या संधी

सावरगावपासून बागपिंपळगावपर्यंत रस्ता पूर्ण झाल्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, माजलगावहून जाणारी वाहने अंतर कमी होत असल्याने सावरगाव-राजेगाव-टाकरवण तलवाडामार्गे औरंगाबादकडे जातील. यामुळे या रस्त्यावर हाॅटेल, रसवंतीसह इतर व्यवसाय वाढून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.