शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

दोन तपानंतर रस्त्याचा वनवास संपतोय ; बागपिंपळगाव-तलवाडा-टाकरवण-सावरगाव रस्त्याचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST

तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - ...

तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - सावरगाव या रस्त्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. बागपिंपळगाव म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग ५२ पासून राजापूरपर्यंतचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. काही पूल व वरील एक थर बाकी आहे. यामुळे प्रवास मात्र सुसह्य झालेला आहे.

गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होती. मोठ-मोठ्या खड्ड्यांसह खडी, धूळ व दोन्ही बाजूंनी वेढलेल्या झाडांमुळे काही ठिकाणी तर पाणंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती. या भागातील ३०-४० गावांतील लोकांना प्रवास करताना मरणयातना भोगाव्या लागत होत्या. ऊस वाहतूक करणारी वाहने उलटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे यामुळे या भागात ऊस वाहतुकीस वाहने देण्यास कोणी धजावत नव्हते.

पण हायब्रीड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास दीडशे कोटी रुपये निधी मिळाल्यानंतर गतवर्षी या रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर कोरोना, पावसाळा यामुळे कामाची गती थोडी मंदावली होती. आता मात्र, या कामाला वेग आला असून बागपिंपळगावपासून राजापूरपर्यंतचा २५ कि.मी. रस्ता चांगला झाला असल्याने या मार्गावरील वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.

या परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे, खडी व धुळीचा त्रास सहन करत जीव मुठीत धरुन प्रवास करायचे, पण सध्या जवळपास २५ कि.मी. रस्ता जवळपास पूर्णत्वास असल्याने वाहनधारकांत समाधान आहे.

ऊसमालकांचा जीव भांड्यात

तालुक्यातील ही गावे गोदाकाठावरील गावे म्हणून ओळखली जातात. उसाचे पाठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावांतून अनेक कारखाने ऊस नेतात, पण रस्ता खराब असल्याने वाहने उलटल्यामुळे वाहनांसह ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. ऊस वाहन कारखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत ऊसमालकासह वाहनमालक चिंतेत असायचे. आता त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

१५ ते २० गावांची वाहतूक झाली सुसह्य

आजपर्यंतच्या झालेल्या कामाने १५-२० गावांतील वाहतूक सुसह्य झाली असून रस्ता पूर्ण झाल्यानंतर ४०-५० गावांची सोय होणार आहे.

वाहतूक वाढून रोजगाराच्या संधी

सावरगावपासून बागपिंपळगावपर्यंत रस्ता पूर्ण झाल्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, माजलगावहून जाणारी वाहने अंतर कमी होत असल्याने सावरगाव-राजेगाव-टाकरवण तलवाडामार्गे औरंगाबादकडे जातील. यामुळे या रस्त्यावर हाॅटेल, रसवंतीसह इतर व्यवसाय वाढून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.