शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर माजलगावकरांना मिळणार दोन दिवसाला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

माजलगाव : धरण उशाला अन् कोरड घशाला... ही म्हण आहे. ती आता माजलगाव शहरवासीयांच्या मनातून कायमची पुसली जाणार आहे. ...

माजलगाव : धरण उशाला अन् कोरड घशाला... ही म्हण आहे. ती आता माजलगाव शहरवासीयांच्या मनातून कायमची पुसली जाणार आहे. माजलगावकरांना दिवाळीनंतर दोन दिवसाला पाणी देणार आहे. यासाठी नवीन दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी दिली.

माजलगाव शहराच्या शेजारी धरण असून देखील शहरवासीयांना महिन्यात केवळ दोन ते तीन वेळा पाणी मिळते. यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होताना दिसतात. मागील दहा, पंधरा वर्षांत शहर परिसर व लोकसंख्या वेगाने वाढत आहे. तरी पण येथील नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या. परंतु एक टाकी अत्यंत जीर्ण झाल्याने चार महिन्यांपासून या टाकीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहराला पाणीपुरवठा केवळ एकाच पाण्याच्या टाकीतून होत आहे. नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी मंजरथ रोडला नवीन पाण्याच्या टाकीची मान्यता मिळविली आहे. पुढील आठवड्यात याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. एकूण तीन टाक्यांतून ३० लाख लिटर पाणी वितरित होईल, असेही शेख यांनी सांगितले.