शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुमितला संपवून त्यांचा रुबाबात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:03 IST

मित वाघमारे या युवकाचा खून करून मुख्य आरोपींनी पोलिसांना चकवा देत सहा दिवस रुबाबात प्रवास केल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सुमित वाघमारे या युवकाचा खून करून मुख्य आरोपींनी पोलिसांना चकवा देत सहा दिवस रुबाबात प्रवास केल्याचे समोर आले आहे. विविध जिल्ह्यात ‘सफर’ करून त्यांनी पैशांची उधळपट्टीही केली. मात्र पोलिसांच्या तावडीतून ते सुटू शकले नाहीत. मंगळवारी पहाटे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.बालाजी शेषकुमार लांडगे (रा.पंचशील नगर बीड) आणि संकेत भागवत वाघ (रा.शिवाजी विद्यालयाजवळ बीड) अशी आरोपींची नावे आहेत. १९ डिसेंबर रोजी सुमित वाघमारे याचा प्रेमप्रकरणातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. सुमितची पत्नी भाग्यश्री वाघमारे हिच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी बीड जिल्ह्यातून पलायन केले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार करून विविध ठिकाणी पाठविले होते. पुणे, औरंगाबाद, लातूर, अहमदनगर, जालना आदी जिल्ह्यात पोलिसांनी शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. अखेर सोमवारी रात्री हे दोन्ही आरोपी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वेस्थानकात असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे सपोनि अमोल धस यांचे पथक त्याठिकाणी पाठविले. धस यांनी सापळा रचून दोघांच्याही मुसक्या आवळल्या. मंगळवारी सकाळी त्यांना बीडमध्ये आणल्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, रोशन पंडीत, पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजकनर, अमोल धस आदींची उपस्थिती होती.पोलिसांनी बनवली शोधपत्रिकाफरार मुख्य आरोपींचा शोध लागत नसल्याने त्यांची शोध पत्रिका त्यांच्या फोटोसह बनविण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना इमेल व मॅसेजद्वारे ती पाठवण्यात आली. अमरावती रेल्वे पोलीसांनी प्राप्त फोटोनुसार आरोपींना ओळखले आणि बडनेरा रेल्वे स्थानकात दोघांनाही मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.बालाजी, संकेतचा सहा दिवसांचा प्रवासखून केल्यानंतर गजानन हा दुचाकी घेऊन अयोध्यानगरात आला. येथे कार सोडून बालाजी, संकेत आणि गजानन हे तिघे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून बायपास रोडला गेले. येथे गजानन याने त्या दोघांना पाडळसिंगी मार्गे अहमदनगरला जाण्यास सांगितले. त्यानंतर तो कृष्णाकडे परत आला. तोपर्यंत हे दोघेही नगरमध्ये पोहचले. संकेतच्या मित्राकडे दुचाकी सोडून ते खाजगी वाहनातून पुण्याला गेले. येथे एका पाहुण्याकडे मुक्काम केला. तेथून कल्याणला गेले. नंतर तिरूपती, विशाखापट्टनम, हैदराबाद, नागपूर, अमरावती असा प्रवास केला. बडनेरा येथून ते नागपूरला जाण्याच्या तयारीत असतानाह पोलिसांनी त्यांना पकडले.तो आला अन् परिस्थिती पाहून गेला..खुनाचा कट रचनारा गजानन क्षीरसागर हा घटनेनंतर फरार झाला होता. परंतु पोलिसांच्या यादीत आपण नसल्याचे त्याला समजले. तो लगेच बीडमध्ये आला. दोन दिवस राहिला, परिस्थिती पाहून पुन्हा पसार झाला. पोलिसांनी योग्य तपास करून आधी कृष्णाला ताब्यात घेतले. मंगळवारी सायंकाळी गजाननलाही बेड्या ठोकल्या.कृष्णासह त्याचा मोठा भाऊही कटात सहभागीसुमितचा खून हा पुर्वनियोजीत कट असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. कट रचनारा कृष्णा रविंद्र क्षीरसागर याला सोमवारी बेड्या ठोकल्या. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र, या कटात कृष्णाचा मोठा भाऊ गजानन देखील सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यालाही ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या दोघांनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा झाल्यानंतर मुख्य आरोपींना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक