शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांच्या विश्रांतीनंतर आष्टी तालुक्यात पुन्हा धो- धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

अविनाश कदम आष्टी : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने तालुक्यात खरिपाची पुरती दैना झाली आहे. प्राथमिक ...

अविनाश कदम

आष्टी : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने तालुक्यात खरिपाची पुरती दैना झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे ३९ हजार हेक्टरला दणका बसला आहे. १० दिवसांच्या विश्रांतीनंतर २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी व शनिवारी तालुक्यात रात्रभर सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतातील कांदा, तूर, कापूस पिके अतिरिक्त पाणी साठल्याने सडू लागली आहेत.

शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या उडदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यातून सावरत नाही तोच ढगाळ वातावरण व पावसाने लागवड व पेरणी केलेल्या क्षेत्रातील कांदा सडू लागला आहे. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परिसरात जोरदार पावसाने नदीनाले तुडुंब भरून शेतात पाणी साचले. दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री १० वाजेपासून रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्या तर रविवारची सकाळ दाट धुके घेऊन आली. पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

....

ढगाळ वातावरणामुळे कांदा, तूर, कापूस पिकावर वेळेत फवारणी करावी

ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शेतकऱ्यांनी योग्य त्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. तूर, कापूस या पिकांवर रसशोषण व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे योग्य त्या औषधांची सूक्ष्म मूलद्रव्यासहित वेळेत फवारणी करावी.

- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

260921\img-20210926-wa0280_14.jpg