शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांच्या विश्रांतीनंतर आष्टी तालुक्यात पुन्हा धो- धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

अविनाश कदम आष्टी : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने तालुक्यात खरिपाची पुरती दैना झाली आहे. प्राथमिक ...

अविनाश कदम

आष्टी : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने तालुक्यात खरिपाची पुरती दैना झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे ३९ हजार हेक्टरला दणका बसला आहे. १० दिवसांच्या विश्रांतीनंतर २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी व शनिवारी तालुक्यात रात्रभर सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतातील कांदा, तूर, कापूस पिके अतिरिक्त पाणी साठल्याने सडू लागली आहेत.

शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या उडदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यातून सावरत नाही तोच ढगाळ वातावरण व पावसाने लागवड व पेरणी केलेल्या क्षेत्रातील कांदा सडू लागला आहे. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परिसरात जोरदार पावसाने नदीनाले तुडुंब भरून शेतात पाणी साचले. दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री १० वाजेपासून रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्या तर रविवारची सकाळ दाट धुके घेऊन आली. पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

....

ढगाळ वातावरणामुळे कांदा, तूर, कापूस पिकावर वेळेत फवारणी करावी

ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शेतकऱ्यांनी योग्य त्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. तूर, कापूस या पिकांवर रसशोषण व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे योग्य त्या औषधांची सूक्ष्म मूलद्रव्यासहित वेळेत फवारणी करावी.

- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

260921\img-20210926-wa0280_14.jpg