शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कायदे-नियमांचा अंगिकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:09 IST

व्यापार क्षेत्रातील बदलत्या कायद्यांचा आणि नियमांचे ज्ञान घेऊन त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व्यापारी हा मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यावरच ईथला रोजगार अवलंबून आहे. व्यापार क्षेत्रातील बदलत्या कायद्यांचा आणि नियमांचे ज्ञान घेऊन त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी केले.बीड शहर, तालुका व जिल्हा व्यापारी महासंघ व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विद्यमाने अन्न नोंदणी व अन्न व्यापार परवाना नोंदणी मार्गदर्शन शिबीर तसेच मेळाव्यात बोलत होते. मंचावर अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे,सहाय्यक आयुक्त रामेश्वर डोईफोडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋ षिकेश मरेवार, अनिकेत भिसे, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अरु ण बरकसे, व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी,जवाहर कांकरिया, अशोक शेटे, विनोद पिंगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद पिंगळे यांनी केले. मेळाव्याला जिल्हाभरातून व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.१५००० नोंदणी अन् १५०० परवानेदिवसभरात १५० व्यापारी, व्यावसायिकांनी अन्न परवान्याची नोंदणी केली. मेळाव्यात उपस्थित व्यापाऱ्यांपैकी बहुतांश जणांनी याआधीच अन्न नोंदणी व अन्न परवाने काढलेले होते.१२ लाखांच्या आतील वार्षिक उलाढाल असलेल्या जवळपास १५ हजार व्यावसायिकांनी नोंदणी तसेच १२ लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या १५०० व्यावसायिकांनी आतापर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेतल्योच सूत्रांनी सांगितले.अन्न नोंदणी आवश्यक१२ लाखाच्या आतील तसेच जास्त वार्षिक उलाढाल असणाºया खाद्य पदार्थ व्यवसायिकांनी नोंदणी करणे व परवाना बंधनकारक आहे. १२ लाखाच्या आतील व्यवसायिकांना नोंदणीसाठी फॉर्म - ए, पाच वर्षांचे शुल्क ५०० रुपये, ओळखीचा पुरावा, फोटो, जागेचे पीटीआर, सातबारा, किरायाने असल्यास मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असते.अन्न परवाना यांच्यासाठी१२ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणा-या खाद्यपदार्थ व्यावसायिकांना परवाना घेण्यासाठी फार्म- बी, वार्षिक शुल्क २००० रुपये फोटो, ओळखीचा पुरावा, जागेचा पुरावा, किरायाने असेल तर जागा मालकाचे नाहरकत व करारपत्राची प्रत,भागीदारी असेल तर पार्टनरशिप डिड तसेच जागेचा नकाशा ही कागदपत्रे आवश्यक असतात.अन्न सुरक्षा मानके कायद्याबाबत उपस्थितांना मान्यवरांचे मार्गदर्शनअन्न औषध प्रशासनाचे आयुक्त कृष्णा दाभाडे म्हणाले, अन्न पदार्थासंदर्भातील अन्न सुरक्षा मानके कायदा हा महत्वाचा कायदा आहे.रोजच्या जगण्यात या कायद्याचा संबंध आढळून येतो. यासाठीचा परवाना असल्याशिवाय सदरील व्यापार करता येत नाही.त्यासाठी सर्वांनी अन्न नोंदणी करावी आणि मोठया व्यवसायिकांनी अन्न परवाना घ्यावा, असे ते म्हणाले.व्यवसाय प्रकाराबाबत यावेळी माहिती देण्यात आली. काइन्ड आॅफ बिझीनेसमध्ये नोंद करताना व्यवसायातील खाद्यपदार्थाचा ठळक उल्लेख महत्वाचा असतो.तसेच काढलेला परवाना व्यवसाय स्थळी दर्शनी भागात लावणे आवश्यक असल्याचे यावेळी आयुक्त दाभाडे यांनी सांगितले.मेळाव्यात अन्न सुरक्षा मानके, या संदर्भातील कायदे, परवाने आदींची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागbusinessव्यवसायGovernmentसरकार