शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

माजलगावात प्रशासन बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST

माजलगाव : कोरोना रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे आदेश असताना शुक्रवारी व शनिवारी हा आदेश धुडकावून माजलगाव शहरात ...

माजलगाव : कोरोना रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे आदेश असताना शुक्रवारी व शनिवारी हा आदेश धुडकावून माजलगाव शहरात मोंढ्यात चक्कपणे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवली, तर मुख्य रस्त्यावर व विविध भागांत दुकाने दिवसभर बिनदिक्कतपणे सुरू असल्याने रस्त्यावर लोकांची मोठी वर्दळ दिसून येत होती. असे असताना येथील प्रशासन बेफिकीर असल्याने नियम धाब्यावर बसवण्यात आले त्यामुळे कोरोना कसा आटोक्यात येणार? असा प्रश्न पडला आहे.

कोरोना रोखण्यासाठी विविध प्रतिबंध घालत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला फक्त रमजान ईदनिमित्त ११ व १२ तारखेस किराणा, ड्रायफ्रूट, मटण दुकाने यांना ७ ते १० वेळेत परवानगी देण्यात आली होती. तरीही हा आदेश धुडकावून शुक्रवारी व शनिवारी सर्व बाजारपेठ उघडली. परंतु शहरात तहसील प्रशासन बेफिकीर असल्याने लॉकडाऊनचा फज्जा झाला आहे. लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत व त्यांना हव्या त्या वस्तू दुकानदार दुकाने उघडून देत आहेत, असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मोठी कापड दुकाने शटर वर करून ग्राहकांना आत प्रवेश देतात व पुन्हा शटर बंद करतात, खरेदी झाल्यावर ग्राहकांना बाहेर सोडतात. अशा पद्धतीने काही दुकानांत लग्नाचे बस्तेदेखील विक्री होत आहेत. याबाबत पोलिसांना माहिती देऊनही पोलीस गप्प बसण्याची भूमिका घेत आहेत हे विशेष. शहरातील धारूररोडवर चहाची हॉटेल्स सर्रासपणे सुरू आहेत येथे तर सतत मोठी गर्दी असते. याच रस्त्यावर सर्व्हिसिंग सेंटरवर तर सर्रास वाहने धुण्यात येत आहेत. मोंढ्यातदेखील अनेक दुकानांबाहेर मालक उभे राहून ग्राहक आला की त्यास पाहिजे ते साहित्य काढून देत असल्याचे चित्र दिसून येत होते, तर लोकदेखील बिनधास्तपणे रस्त्यावर दिवसभर पायी व दुचाकीवर फिरताना दिसून येत होते. मुख्यतः व्यापाऱ्यांनीच लॉकडाऊन धुडकावून चक्क दुकाने सुरू केल्यानंतर याबाबतीत पोलिसांना व नगर परिषद कर्मचारी यांना गांभीर्य नसल्याने लॉकडाऊन नावालाच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

-----

लॉकडाऊन सुरळीत चालू ठेवण्यासाठी एखादी-दुसरी वेळ सोडली, तर तहसीलदार वैशाली पाटील कधीच रस्त्यावर दिसल्या नाहीत. तसेच त्यांनी नियुक्त केलेले महसूल, पोलीस, नगर परिषदेची पथके कोठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये तत्कालीन तहसीलदार प्रतिभा गोरे या सतत रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होईल यासाठी चोवीस तास कार्यरत असायच्या याची आठवण नागरिकांना येत आहे.