शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भालगाव येथील अतिक्रमण काढायला प्रशासनाला वेळ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST

दीपक नाईकवाडे लोकमत न्यूज नेटवर्क केज : तालुक्यातील भालगाव या गावाचे मांजरा धरणामुळे बावची शिवारातील जमिनीमध्ये पुनर्वसन करण्यात आले. ...

दीपक नाईकवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : तालुक्यातील भालगाव या गावाचे मांजरा धरणामुळे बावची शिवारातील जमिनीमध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने पुनर्वसित केलेल्या भालगावला वस्तीवाढ व स्मशानभूमीस इनामी जमिनीतील ८१ आर. जमीन दिली. मात्र, या जमिनीमध्ये केलेले अतिक्रमण काढण्यासाठी मागील सतरा वर्षांपासून भालगावचे ग्रामस्थ तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत.

केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणासाठी अनेक गावच्या जमिनी संपादित करण्यात आल्या तर काही गावांचे शासनाने पुनर्वसन केले. तालुक्यातील भालगावचेही मांजरा धरणामुळे शासनाने बावची शिवारातील सर्व्हे नं. ४४ व ४५ मधील जमिनीमध्ये पुनर्वसन केले व भालगावला वस्तीवाढ व स्मशानभूमीसाठी श्री देवींची इनामी जमिनीतील सर्व्हे नं. ४५ मधील ८१ आर. जमीन शासनाने मंजूर करून दिली. मात्र, या जमिनीवर काही जणांनी अतिक्रमण केल्याने ते जमीन सोडण्यास तयार नसल्याने भालगाव ग्रामस्थ केजच्या महसूल प्रशासनाकडे मागील सतरा वर्षांपासून दाद मागत आहेत. या जमिनीवरील अतिक्रमण काढा म्हणून निवेदन देऊन तहसील कार्यालयाचा उंबरठा झिजवत आहेत. तरीही अद्याप केजच्या महसूल विभागाला जाग आलेली नाही. या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी भालगाव ग्रामपंचायतने २३ जुलै २०१९ व २ जुलै २०२१ रोजी ठराव घेऊन अतिक्रमण काढून सातबाराला नोंद घेण्याची मागणी तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्याकडे केली आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेले केजचे महसूल प्रशासन आता तरी भालगाव येथील वस्तीवाढ व स्मशानभूमीसाठी दिलेल्या इनामी जमिनीतील ८१ आर जमिनीवरील अतिक्रमण काढून त्याची सातबाराला नोंद घेईल का याची भालगाव ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे.

अधिकारी कारवाई करत नाहीत

भालगाव गावचे पुनर्वसन झाल्यानंतर शासनाने श्री देवीची इनामी जमिनीतील सर्व्हे नं. ४५ मधील ८१ आर जमीन वस्तीवाढ व स्मशानभूमीस दिली. मात्र, या जमिनीवर काही राजकीय मंडळींनी अतिक्रमण केलेले आहे. हे अतिक्रमण काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून करत आहोत. मात्र, अधिकारी आमच्या मागणीची दखल घेत नाहीत, असे भालगाव येथील ग्रामस्थ नामदेव क्षीरसागर यांनी सांगितले.

अतिक्रमण काढण्याची कारवाई करू

भालगाव येथील जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत गेल्या वर्षी अर्ज आला होता. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे कारवाई करता आली नाही. या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी ‘लोकमत’ला दिली.