शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

‘मांजरा’चे कार्यालय सोमवारपर्यंत अंबाजोगाईत कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:34 IST

बीड जिल्ह्याचा प्रमुख जलस्त्रोत असणा-या मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय लातूर येथून अंबाजोगाईत स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाच्या वतीने आठवडाभरापूर्वीच देण्यात आले. हे कार्यालय १५ जानेवारीपासून अंबाजोगाईत कार्यान्वित करा, असे आदेश असूनही स्थलांतराबाबत प्रशासन अजूनही सुस्तच आहे. उलट स्थलांतर रोखण्यासाठी लातूरचे राजकारणी एकवटले असून अधिका-यांचीही लातूरकरांना पुष्टी मिळू लागली आहे. बीड जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन हे स्थलांतर तात्काळ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देस्थलांतर रोखण्यासाठी लातूरचे राजकारणी एकवटले; प्रशासनही सुस्त असल्याने शेतक-यांमधून संताप

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्याचा प्रमुख जलस्त्रोत असणा-या मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय लातूर येथून अंबाजोगाईत स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाच्या वतीने आठवडाभरापूर्वीच देण्यात आले. हे कार्यालय १५ जानेवारीपासून अंबाजोगाईत कार्यान्वित करा, असे आदेश असूनही स्थलांतराबाबत प्रशासन अजूनही सुस्तच आहे. उलट स्थलांतर रोखण्यासाठी लातूरचे राजकारणी एकवटले असून अधिका-यांचीही लातूरकरांना पुष्टी मिळू लागली आहे. बीड जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन हे स्थलांतर तात्काळ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

केज व अंबाजोगाई तालुक्यातील ज्या शेतक-यांच्या हजारो एक्कर शेतजमिनी मांजरा धरणाच्या निर्मितीसाठी अधिग्रहण झाल्या. त्याच शेतकºयांची मोठी उपेक्षा सातत्याने धरण प्रशासनाकडून होत आहे. शेतजमिनी बीड जिल्ह्यातील अन् धरणाचा फायदा लातूरला अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. हा भाग प्रामुख्याने अंबाजोगाई व केज तालुक्यात येतो. मांजरा धरण धनेगाव येथे केज तालुक्यातच असल्याने अंबाजोगाई येथे धरणाचे उपविभागीय कार्यालय सोयीस्कर ठरते. मात्र, धरणाच्या निर्मितीपासून हे कार्यालय लातूरला ठेवण्यात आले आहे. याचा मोठा फटका या परिसरातील शेतकºयांना निमूटपणे सहन करावा लागतो. लातूर येथील या कार्यालयाचे स्थलांतर अंबाजोगाई येथे करण्यात यावे, ही मागणी गेल्या २० वर्षांपासून सातत्याने लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या माध्यमातून होत आहे. याचाच पाठपुरावा म्हणून जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी शेतकºयांच्या मागणीनुसार हे उपविभागीय कार्यालय लातूर येथून अंबाजोगाई येथे १५ जानेवारीपूर्वी स्थलांतरित करावे, असे आदेश दिले आहेत. तसेच पत्र महाराष्ट्राच्या उपसचिवांनीही पाठविले आहे.

कार्यालयाचे स्थलांतर रोखण्यासाठी मात्र लातूर येथील राजकारणी एकवटले असून प्रशासनातील अधिका-यांचीही त्यांना पुष्टी आहे. लातूर येथून कारभार हाकणा-या अधिका-यांना थेट जनतेशी संपर्क येत नाही. हे कार्यालय अंबाजोगाईत स्थलांतरित झाल्यास अधिका-यांना अंबाजोगाईत रहावे लागेल. अंबाजोगाईत राहणे टाळण्यासाठी अधिकाºयांनी लातूरच्या राजकारण्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे बोलले जात आहे.ती आॅर्डरच मिळाली नाहीकार्यालयाचे स्थलांतर अंबाजोगाईत व्हावे व ही प्रक्रिया १५ जानेवारीपूर्वी करण्यात यावी, असे शासनाचे अध्यादेश आहेत. मात्र, तशी आॅर्डरच अजून आपल्या कार्यालयाला प्राप्त झाली नाही, अशी प्रतिक्रिया मांजरा धरणाचे उपविभागीय अभियंता महेंद्र जोशी यांनी दिली. प्रशासनच सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

कार्यालयाचे स्थलांतर रोखल्यास आंदोलनमांजरा धरणाची निर्मिती ही केज व अंबाजोगाई तालुक्यातील शेतक-यांच्या शेतजमिनींमुळे झाली आहे. धरणग्रस्तांना किमान धरणाचे पाणी व त्यासाठीच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपविभागीय कार्यालय अंबाजोगाईत असणे अत्यंत गरजेचे आहे. या कार्यालयाचे स्थलांतर लातूर येथून अंबाजोगाई येथे व्हावे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला आहे. शासनाच्या वतीने स्थलांतराची प्रक्रियाही सुरू झाली.प्रशासनाच्या वतीने हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे प्रमुख नंदकिशोर मुंदडा यांनी दिला.

पालकमंत्र्यांकडून अपेक्षापालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारामुळे मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालयाचे स्थलांतर लातूर येथून अंबाजोगाईत व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, हे स्थलांतर रोखण्यासाठी लातूरचे राजकारणी एकवटल्यामुळे पालकमंत्री मुंडे यांनी स्थलांतर रोखण्याचा घाट उधळून लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.