शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

बीड : खरीप हंगामात बीड जिल्ह्यात पीककर्ज वाटपात मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी गती आली आहे. ७ जूनपर्यंत ...

बीड : खरीप हंगामात बीड जिल्ह्यात पीककर्ज वाटपात मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी गती आली आहे. ७ जूनपर्यंत ११ हजार ५३० शेतकऱ्यांना ९५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण ५.९१ टक्के इतके आहे. गतवर्षी १ एप्रिल ते १५ जूनपर्यंत पीक कर्ज वाटपाचे प्रमाण आठ टक्के होते.

खरीप हंगाम २०२१-२२ साठी बीड जिल्ह्याला १६०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. एक एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला जिल्ह्यातील बँकांनी सुरुवात केली. पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला आहे तर अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीधर कदम यांनी जिल्ह्यातील बँकांशी समन्वय राखत पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी सातत्याने संपर्क ठेवला आहे.

चालू आर्थिक वर्षात १ ते ३० एप्रिलपर्यंत ८५१ शेतकऱ्यांना १८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. एप्रिल आणि मेमध्ये ४ हजार ५८२ शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर तसेच कर्ज वाटप झाले. त्यानंतर मात्र जूनमध्ये या प्रक्रियेला वेग आला ७ जूनपर्यंत ११ हजार ५३० शेतकऱ्यांना ९५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने ४ हजार ९२० शेतकऱ्यांना ४५ कोटी ६१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ॲक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, कोटक महिंद्रा, आरबीएल बँकेच्यावतीने ३९२ शेतकऱ्यांना ९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने २१९२ शेतकऱ्यांना १६ कोटी ५० लाख रुपयांचे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४ हजार २६ शेतकऱ्यांना २२ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

मागील वर्षी १५ जूनपर्यंत ११ हजार ७०४ शेतकऱ्यांना ८८ कोटी १२ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. त्यावेळी खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट ९५० कोटी रुपयांचे होते. यावर्षी १६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असल्याने व ते शंभर टक्के साध्य करण्यासाठी शासन, प्रशासन व बँक पातळीवर प्रयत्न होत आहेत.