शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

मीटर नसताना रिडींगप्रमाणे कृषिपंपाचे बिल शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:33 IST

दीपक नाईकवाडे केज : शेती पंपाला दहा तास सुरळीत वीज पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश असतानाही शेती पंपासाठी सुरळीत ...

दीपक नाईकवाडे

केज : शेती पंपाला दहा तास सुरळीत वीज पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश असतानाही

शेती पंपासाठी सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यातच शेती पंपाला मीटर बसवलेले नसताना मीटर रिडींगप्रमाणे वीज बिल अंदाजपंचे तसेच न वापरलेल्या विजेचेही अवाढव्य वीजबिल दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच वीजबिल हातात पडत नसल्याने शेती पंपाच्या वीज बिलाची वसुली चालू होते.

तेव्हाच वीजबिलाचा आकडा समजत असल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना

सांगितले. शेतकऱ्यांना वीज पंपाचे बिल रीडिंगप्रमाणे दिले जात असल्याचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

महावितरण कंपनीने शेती पंपाला दिलेल्या विजेच्या बिलाची वसुली जोरात

चालू केली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली करण्यात येत आहे. त्या शेतकऱ्यास गेल्या दोन तीन वर्षांपासून विजेचे बिलच वीज कंपनीने

दिलेले नाही. वीज जोडणी

देताना शेतकऱ्याने वापरलेल्या विजेची रिडींग घेण्यासाठी मीटर बसवणे

आवश्यक असताना वीज मीटर बसवण्यात आलेले नाहीत. मात्र, शेतकऱ्यांना

विजेचे बिल देताना मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देऊन गुत्तेदार पोसण्याचे काम महावितरण कंपनी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लाईनमनकडे वीजबिल मागितले तर तो केजला वीज कंपनीच्या

कार्यालयात जाऊन वीजबिल घ्या, असे सांगतो. मात्र, आम्हाला कोणत्याही

प्रकारची माहिती न देता आमच्या गावाचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे

आम्ही वीजबिल कसे भरायचे, असे बोबडेवाडी येथील शेतकरी

अविनाश बोबडे यांनी लोकमतला सांगितले. शेती पंपाला वीज मीटर बसविण्यात आलेले नाहीत. त्यातच अंदाजपंचे रिडींग नोंदवून बिले काढली जातात. मात्र, ते बिल शेतकऱ्यास दिली जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे लाखोंची वीज बिले थकली आहेत.

मीटर बसवले, रिडींगप्रमाणेच बील

केज येथील महावितरण कंपनीचे

सहायक अभियंता राजेश आंबेकर यांना विचारले असता, पूर्वी शेती पंपाचे वीजबिल हे पंपाच्या अश्वशक्तीप्रमाणे दिले जात होते.

मात्र, सध्या शेतीपंपाला विजेचे मीटर बसविण्यात आलेले असून, त्याना मीटर रिडींगप्रमाणे विजेचे बिल देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मीटर गेले कुठे?

विजेचे मीटर बसविण्यात आले तर ते गेले कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. विजेचे मीटर बसविण्यात आलेले आहेत का? याची माहिती लाईनमनला विचारली असता

त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर शेती पंपाला विजेचे मीटर बसविण्यात

आलेले नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना गुत्तेदार वीज बिलाचे वाटप करत नसल्याने त्यांना वीज बिल मिळत नसल्याचेही लाईनमनने सांगितले.