शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात सात वर्षांत ८५ माता मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:34 IST

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यातील राज्याच्या तुलनेत माता मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरी मागील सात वर्षांत तब्बल ८५ मातांचा ...

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यातील राज्याच्या तुलनेत माता मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरी मागील सात वर्षांत तब्बल ८५ मातांचा जीव गेला आहे. यात २० ते २५ वयोगटांतील मातांचा सर्वाधिक समावेश आहे. उच्च रक्तदाब आणि प्रसूतीवेळी होत असलेल्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू होत असल्याचे उघड झाले आहे. गरोदर असताना १६ तर प्रसूती झाल्यानंतरही ६५ मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मृत्यू राेखण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी त्यात पूर्णपणे यश आलेले नाही.

महिला गर्भवती असल्यापासून ते प्रसूतीनंतर ४२ दिवसांपर्यंत मृत्यू झाला, तर त्याची माता मृत्यू म्हणून नोंद होते. मातेचा मृत्यू होताच, तत्काळ माता मृत्यू अन्वेषन समितीपुढे हे प्रकरण आणले जाते. संबंधित मातेवर काय उपचार झाले आणि मृत्यूचे नेमके कारण काय, हे शोधण्याचे काम ही समिती करते. कारण शोधण्यासह भविष्यात पुन्हा त्याच कारणांनी माता मृत्यू होऊ नये, यासाठी ही समिती उपाययोजना सुचविते. असे असले, तरी अद्यापही बीड जिल्ह्यातील माता मृत्यू १०० टक्के रोखण्यात आरोग्य विभागाला यश आलेले नाही. हे मृत्यू राेखण्यासाठी जनजागृती, उपाययोजना, अन्वेषण, तपासणी, उपचार केले जात आहेत. मातांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासह आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

कोण असते समितीत अन् काय करते

माता मृत्यू अन्वेषण समितीचे अध्यक्ष हे जिल्हा शल्य चिकित्सक असतात. या समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बालसंगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख, जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग संघटनेचे पदाधिकारी यांचा समावेश असतो. माता गर्भवती असण्यापासून ते मृत्यूपर्यंत ज्यांनी-ज्यांनी काळजी आणि उपचार केले, त्या सर्वांना समितीसमोर बोलावले जाते. यातून कारणे शोधून उपाययोजना केल्या जातात.

सुरक्षित मातृत्व अभियानाचा फायदा

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आरोग्य संस्थेत गर्भवतींची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी केली जाते. येथे हाय रिस्क माता शोधून त्यांच्यावर निदान करणे शक्य होेत आहे. हे अभियान बीडमध्ये प्रभावी राबविले जात आहे.

प्रसूतीवेळी होतोय रक्तस्त्राव

सात वर्षांतील सर्वाधिक २१ मृत्यू हे प्रसूतीवेळी रक्तस्त्राव झाल्याने झाले आहेत. रक्त गोठण्याचे प्रमाण वाढल्याने १७ तर उच्च रक्तदाबामुळे १६ मृत्यू झाले आहेत, इतर कारणांमुळे ३१ मृत्यूची नोंद झाली आहे.

कोट - फोटो

गरोदरपणापासून ते प्रसूतीनंतर ४२ दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाल्यास तो माता मृत्यू असतो. मृत्यूचे कारण शोधून उपाययोजना करण्यासाठी माता मृत्यू अन्वेषण समिती आहे. राज्याच्या तुलनेत बीडचा मृत्युदर कमी आहे. तो शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

डॉ.संजय कदम

माता व बालसंगोपन अधिकारी बीड

------

वयोगटांनुसार मृत्यू

० ते २० - ७

२० ते २५ - ५७

२५ ते३० - १४

३० पेक्षा जास्त - ७

---

मृत्यूचे ठिकाण

जिल्हा रुग्णालय - २७

स्वाराती अंबाजोेगाई - १५

घरी - ७

रस्त्यांत - ४

इतर - ३२

-------

कसे झाले मृत्यू

गर्भवती १६

प्रसूतीवेळी ४

प्रसूतीनंतर ६५

-----

प्रसूती प्रकार

नॉर्मल ५६

सिझर २९

----

प्रसूतीची खेप

१ ली ४०

२ री २२

३ री १४

त्यापुढील ९

---

मृत्यूची कारणे

उच्च रक्तदाब १६

रक्तस्त्राव २१

इक्त गोठण्याचे प्रमाण वाढणे १७

इतर ३१

---

शिक्षण

प्राथमिक २७

माध्यमिक ३८

अशिक्षित २०

----

वर्षनिहाय मृृत्यू

२०१४-१५ = २२

२०१५-१६ = १०

२०१६-१७ = १३

१०१७-१८ = १०

२०१८-१९ = ७

२०१९-२० = ११

२०२०-२१ = १२

एकूण - ८५