शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

१२२ धोकादायक इमारतींत ८०० रहिवासी; मरण्याची हौस नाही पण..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

बीड : शहरात धोकादायक इमारतींची संख्या १२२ असून त्यात जवळपास ८०० लोक राहत असल्याचे समोर आले आहे. बीड पालिकेने ...

बीड : शहरात धोकादायक इमारतींची संख्या १२२ असून त्यात जवळपास ८०० लोक राहत असल्याचे समोर आले आहे. बीड पालिकेने मान्सून सुरू होण्यापूर्वी सर्वेक्षण केले असता हा प्रकार समोर आला आहे. या सर्वांना नोटीस दिल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी पाऊस, वादळात या इमारतींना धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे गरजेचे आहे.

बीड शहरात प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. बांधकाम विभाग आणि स्वच्छता विभागाकडून पाहणी करून धोकादायक इमारती असलेल्या लोकांना नोटीस बजावली जाते. बीड शहरात सर्वात जास्त अशा इमारतींची संख्या ही पेठबीड भागात असल्याचे पालिका सर्वेक्षणातून समोर आले आहे. गतवर्षी १२६ संख्या होती. त्यातील चौघांनी स्वत:हून इमारती पाडल्याचे पालिकेने सांगितले. असे असले तरी अद्यापही १२२ इमारती उभ्या असून, त्यात रहिवासी वास्तव्य करत आहेत. जास्त पाऊस, वादळ झाल्यास इमारतींना धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वता:हून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आवश्यक आहे, अन्यथा जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्याची गरज आहे. पालिकेने मात्र, नोटीस देऊन जबाबदारी झटकली आहे.

स्थलांतर करायचेय; पण कोठे?

ज्या इमारती धोकादायक आहेत, त्यातील लोकांनी स्थलांतर करायचे ठरवले तरी कोठे राहायचे? असा प्रश्न आहे. प्रशासन अथवा नगरपालिकेने त्यांच्यासाठी कसलीही व्यवस्था केलेली नाही. दुसरी बाजू म्हणजे या लोकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने नवे घर बांधू शकत नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी किरायाने जाऊ शकत नाहीत. हे लोक पुढे येऊन बोलण्यास नकार देत आहेत. असे असले तरी त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

प्रत्येक वर्षी नोटीसचा पाहुणचार

बीड नगरपालिकेकडून प्रत्येक वर्षी पावसाळा आला की, या लोकांना नोटीस पाठविली जाते. सुदैवाने आतापर्यंत तरी दुर्घटना घडलेली नाही. त्यामुळे समाधान आहे. पालिकाही केवळ नोटीस देऊन बघ्याची भूमिका घेते; परंतु यावर ठोस उपाययोजना अथवा कारवाई करत नसल्याचे दिसत आहे.

--

गतवर्षी १२६ इमारती धोकादायक होत्या. चौघांनी पाडल्या असून आता ही संख्या १२२ वर आली आहे. यात जवळपास ८०० लोक वास्तव्यास आहेत. त्यांना याबाबत नोटीसही दिली आहे. इमारत पाडण्यासह सुरक्षिततेची जबाबदारी ही त्यांचीच आहे.

डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी न. प. बीड

---

बीड शहरातील धोकादायक इमारती १२२

वास्तव्य करणारे रहिवासी ८००

===Photopath===

090621\09_2_bed_5_09062021_14.jpeg

===Caption===

बीड शहरात अशाप्रकारे इमारती असून त्यात लोक वास्तव्यास आहेत. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाल्यास दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. यात काळजी घेण्याची गरज आहे.