शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

१२२ धोकादायक इमारतींत ८०० रहिवासी; मरण्याची हौस नाही पण..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

बीड : शहरात धोकादायक इमारतींची संख्या १२२ असून त्यात जवळपास ८०० लोक राहत असल्याचे समोर आले आहे. बीड पालिकेने ...

बीड : शहरात धोकादायक इमारतींची संख्या १२२ असून त्यात जवळपास ८०० लोक राहत असल्याचे समोर आले आहे. बीड पालिकेने मान्सून सुरू होण्यापूर्वी सर्वेक्षण केले असता हा प्रकार समोर आला आहे. या सर्वांना नोटीस दिल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी पाऊस, वादळात या इमारतींना धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे गरजेचे आहे.

बीड शहरात प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. बांधकाम विभाग आणि स्वच्छता विभागाकडून पाहणी करून धोकादायक इमारती असलेल्या लोकांना नोटीस बजावली जाते. बीड शहरात सर्वात जास्त अशा इमारतींची संख्या ही पेठबीड भागात असल्याचे पालिका सर्वेक्षणातून समोर आले आहे. गतवर्षी १२६ संख्या होती. त्यातील चौघांनी स्वत:हून इमारती पाडल्याचे पालिकेने सांगितले. असे असले तरी अद्यापही १२२ इमारती उभ्या असून, त्यात रहिवासी वास्तव्य करत आहेत. जास्त पाऊस, वादळ झाल्यास इमारतींना धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वता:हून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आवश्यक आहे, अन्यथा जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्याची गरज आहे. पालिकेने मात्र, नोटीस देऊन जबाबदारी झटकली आहे.

स्थलांतर करायचेय; पण कोठे?

ज्या इमारती धोकादायक आहेत, त्यातील लोकांनी स्थलांतर करायचे ठरवले तरी कोठे राहायचे? असा प्रश्न आहे. प्रशासन अथवा नगरपालिकेने त्यांच्यासाठी कसलीही व्यवस्था केलेली नाही. दुसरी बाजू म्हणजे या लोकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने नवे घर बांधू शकत नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी किरायाने जाऊ शकत नाहीत. हे लोक पुढे येऊन बोलण्यास नकार देत आहेत. असे असले तरी त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

प्रत्येक वर्षी नोटीसचा पाहुणचार

बीड नगरपालिकेकडून प्रत्येक वर्षी पावसाळा आला की, या लोकांना नोटीस पाठविली जाते. सुदैवाने आतापर्यंत तरी दुर्घटना घडलेली नाही. त्यामुळे समाधान आहे. पालिकाही केवळ नोटीस देऊन बघ्याची भूमिका घेते; परंतु यावर ठोस उपाययोजना अथवा कारवाई करत नसल्याचे दिसत आहे.

--

गतवर्षी १२६ इमारती धोकादायक होत्या. चौघांनी पाडल्या असून आता ही संख्या १२२ वर आली आहे. यात जवळपास ८०० लोक वास्तव्यास आहेत. त्यांना याबाबत नोटीसही दिली आहे. इमारत पाडण्यासह सुरक्षिततेची जबाबदारी ही त्यांचीच आहे.

डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी न. प. बीड

---

बीड शहरातील धोकादायक इमारती १२२

वास्तव्य करणारे रहिवासी ८००

===Photopath===

090621\09_2_bed_5_09062021_14.jpeg

===Caption===

बीड शहरात अशाप्रकारे इमारती असून त्यात लोक वास्तव्यास आहेत. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाल्यास दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. यात काळजी घेण्याची गरज आहे.