शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मराठी साहित्यातील ८० टक्के पुस्तके रद्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:12 IST

केवळ भावनाप्रधान लिखाण करून आत्मप्रौढीसाठी केल्या जाणाºया मराठी साहित्याला तात्विक चिंतनाची बैठक आणि बौद्धिकतेचा गंध नाही. जगण्याचे कोणतेही संदर्भ नसणा-या या साहित्यातील ८० टक्के पुस्तके ही किलोने विक्री करण्यायोग्य असतात, अशी परखड टीका ज्येष्ठ कवी चंद्रकांत पाटील यांनी केली.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांनी घेतला लिखाणातील दांभिकपणा आणि साहित्यकारांचा समाचार

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : केवळ भावनाप्रधान लिखाण करून आत्मप्रौढीसाठी केल्या जाणाºया मराठी साहित्याला तात्विक चिंतनाची बैठक आणि बौद्धिकतेचा गंध नाही. जगण्याचे कोणतेही संदर्भ नसणा-या या साहित्यातील ८० टक्के पुस्तके ही किलोने विक्री करण्यायोग्य असतात, अशी परखड टीका ज्येष्ठ कवी चंद्रकांत पाटील यांनी केली. ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवशी सोमवारी (दि.२५) पहिल्या सत्रात चंद्रकांत पाटील यांची रणधीर शिंदे, आसाराम लोमटे आणि तुषार बोडखे यांनी प्रकट मुलाखत घेतली.

याप्रसंगी त्यांनी मराठी साहित्याची दशा, कवितांची अवस्था, लेखकांची नैतकिता, समीक्षेचा उथळपण यांचा सडेतोड शब्दांत समाचार घेतला. आजचे लेखक तटस्थ आणि गंभीर समिक्षेविषयी फारसे उत्सुक नसतात याविषयी बोलताना ते म्हणाले की, आजचे जग हे जाहिरातीचे झाले आहे. तुमची जाहिरात झाली नाही तर तुम्हाला कोणी ओळखत नाही. त्यामुळे आजकाल साहित्यिक वर्तमान पत्र आणि टीव्ही चॅनेलवर येण्यासाठी धडपड करताना दिसतात. उत्तम साहित्यनिर्मितीपेक्षा आपण चर्चेत कसे राहणार यावर त्यांचा भर असतो.

कवितेची समीक्षा करतान ते म्हणाले की, आजकाल सर्वांना कवि व्हायचेय, पण कविता कोणी करू इच्छित नाही. त्यामध्ये ना चिंतन, ना अधिभौतिक विचारांचा ऊहापोह. केवळ भावनेच्या पातळीवर तक्रारीला दु:खाची झालार चढवून अत्यंत उथळ पातळीवर काव्यनिर्मिती मराठी होतेय. ज्याला कवितेची भाषा कळत नाही त्यालादेखील मोठे मोठे वाङ्मय पुरस्कार दिले जातात. भाषेबद्दल एवढी उदासिनता खेदजनक आहे.अनुवादापेक्षा मूळ साहित्य श्रेष्ठचज्या भाषेत जे नाही ते इतर भाषेतून अनुवादाच्या माध्यमातून आणले पाहिजे. दोन संस्कृतींना जोडण्याचे काम अनुवाद करतो. त्यामुळे सांस्कृृतिक पातळीवर जरी अनुवाद महत्त्वाचा असला तरी मूळ सृजनशीलतेच्या तुलनेत तो दुय्यमच असतो. मूळ साहित्य कधीही श्रेष्ठच.

लघुनियतकालिक चळवळीचे यशापयशप्रस्थापित व्यवस्थेला हादरा देण्याचे, व्यवस्थेने नाकारलेल्या विचारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे विद्रोही काम लघुनियतकालिकांनी केले. अशोक शहाणे यांनी अनेक लेखकांसाठी साहित्याची दारे खुली केली. परंतु कोणतीही चळवळ ४० टक्केच यशस्वी होऊ शकते. मराठी साहित्यची मूलभूत चिकित्सा करण्यात ते कमी पडले. आजच्या पीढीने नवीन मुद्दे घेऊन विद्रोह करावा. मात्र, आजच्या विद्यार्थ्यांना नवा विचारच नाही. त्यांचा विवेक हरवला आहे, ही शोकांतिका आहे.

आत्मचरित्र म्हणजे दांभिकपणाची गोष्टतुमच्या जीवनकाहाणीतून सांस्कृतिक समृद्धी होत असेल, नवा विचार समोर येत असेल तर च आत्मचरित्र लिहावे. अन्यथा आत्मसमर्थनात धन्यता मानणारे आत्मचरित्र म्हणजे दांभिकपणाची गोष्ट आहे. आत्मचरित्रामध्ये तुमच्या यशापेक्ष तुमच्या अपयशाची चर्चा असावी. तुम्ही कोठे कमी पडला याविषयी लिहावे.

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन