शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्यातील ८० टक्के पुस्तके रद्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:12 IST

केवळ भावनाप्रधान लिखाण करून आत्मप्रौढीसाठी केल्या जाणाºया मराठी साहित्याला तात्विक चिंतनाची बैठक आणि बौद्धिकतेचा गंध नाही. जगण्याचे कोणतेही संदर्भ नसणा-या या साहित्यातील ८० टक्के पुस्तके ही किलोने विक्री करण्यायोग्य असतात, अशी परखड टीका ज्येष्ठ कवी चंद्रकांत पाटील यांनी केली.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांनी घेतला लिखाणातील दांभिकपणा आणि साहित्यकारांचा समाचार

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : केवळ भावनाप्रधान लिखाण करून आत्मप्रौढीसाठी केल्या जाणाºया मराठी साहित्याला तात्विक चिंतनाची बैठक आणि बौद्धिकतेचा गंध नाही. जगण्याचे कोणतेही संदर्भ नसणा-या या साहित्यातील ८० टक्के पुस्तके ही किलोने विक्री करण्यायोग्य असतात, अशी परखड टीका ज्येष्ठ कवी चंद्रकांत पाटील यांनी केली. ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवशी सोमवारी (दि.२५) पहिल्या सत्रात चंद्रकांत पाटील यांची रणधीर शिंदे, आसाराम लोमटे आणि तुषार बोडखे यांनी प्रकट मुलाखत घेतली.

याप्रसंगी त्यांनी मराठी साहित्याची दशा, कवितांची अवस्था, लेखकांची नैतकिता, समीक्षेचा उथळपण यांचा सडेतोड शब्दांत समाचार घेतला. आजचे लेखक तटस्थ आणि गंभीर समिक्षेविषयी फारसे उत्सुक नसतात याविषयी बोलताना ते म्हणाले की, आजचे जग हे जाहिरातीचे झाले आहे. तुमची जाहिरात झाली नाही तर तुम्हाला कोणी ओळखत नाही. त्यामुळे आजकाल साहित्यिक वर्तमान पत्र आणि टीव्ही चॅनेलवर येण्यासाठी धडपड करताना दिसतात. उत्तम साहित्यनिर्मितीपेक्षा आपण चर्चेत कसे राहणार यावर त्यांचा भर असतो.

कवितेची समीक्षा करतान ते म्हणाले की, आजकाल सर्वांना कवि व्हायचेय, पण कविता कोणी करू इच्छित नाही. त्यामध्ये ना चिंतन, ना अधिभौतिक विचारांचा ऊहापोह. केवळ भावनेच्या पातळीवर तक्रारीला दु:खाची झालार चढवून अत्यंत उथळ पातळीवर काव्यनिर्मिती मराठी होतेय. ज्याला कवितेची भाषा कळत नाही त्यालादेखील मोठे मोठे वाङ्मय पुरस्कार दिले जातात. भाषेबद्दल एवढी उदासिनता खेदजनक आहे.अनुवादापेक्षा मूळ साहित्य श्रेष्ठचज्या भाषेत जे नाही ते इतर भाषेतून अनुवादाच्या माध्यमातून आणले पाहिजे. दोन संस्कृतींना जोडण्याचे काम अनुवाद करतो. त्यामुळे सांस्कृृतिक पातळीवर जरी अनुवाद महत्त्वाचा असला तरी मूळ सृजनशीलतेच्या तुलनेत तो दुय्यमच असतो. मूळ साहित्य कधीही श्रेष्ठच.

लघुनियतकालिक चळवळीचे यशापयशप्रस्थापित व्यवस्थेला हादरा देण्याचे, व्यवस्थेने नाकारलेल्या विचारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे विद्रोही काम लघुनियतकालिकांनी केले. अशोक शहाणे यांनी अनेक लेखकांसाठी साहित्याची दारे खुली केली. परंतु कोणतीही चळवळ ४० टक्केच यशस्वी होऊ शकते. मराठी साहित्यची मूलभूत चिकित्सा करण्यात ते कमी पडले. आजच्या पीढीने नवीन मुद्दे घेऊन विद्रोह करावा. मात्र, आजच्या विद्यार्थ्यांना नवा विचारच नाही. त्यांचा विवेक हरवला आहे, ही शोकांतिका आहे.

आत्मचरित्र म्हणजे दांभिकपणाची गोष्टतुमच्या जीवनकाहाणीतून सांस्कृतिक समृद्धी होत असेल, नवा विचार समोर येत असेल तर च आत्मचरित्र लिहावे. अन्यथा आत्मसमर्थनात धन्यता मानणारे आत्मचरित्र म्हणजे दांभिकपणाची गोष्ट आहे. आत्मचरित्रामध्ये तुमच्या यशापेक्ष तुमच्या अपयशाची चर्चा असावी. तुम्ही कोठे कमी पडला याविषयी लिहावे.

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन