शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

समृद्ध ग्रामच्या मिनी स्पर्धेत जिल्ह्यातील ७८ गावे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

पाणी फाऊंडेशनच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १३४ गावांनी सहभाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात १२० गुणांची स्पर्धा ...

पाणी फाऊंडेशनच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १३४ गावांनी सहभाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात १२० गुणांची स्पर्धा घेण्यात आली. जल बचतीच्या साधनांचा वापर, ठिबक व तुषार सिंचनाखाली असलेली जमीन, रबी, खरीप व बारमाही लागवडीखालील पिके, स्वच्छ पेयजल, गावातील बचत गट, आरक्षित कुरणक्षेत्र, झाडे व जंगले वाढविणे, अस्तित्वात असलेल्या जुन्या रचनांचे सर्वेक्षण, विहिरीची पाणीपातळी मोजणे, गाव शिवारात असलेल्या विहिरी व बोअरवेलची संख्या मोजणे, गावात पर्जन्यमापक बसविणे व पावसाच्या नोंदी ठेवण्यासाठी रजिस्टर तयार करणे या सर्व कामांचा यात समावेश होता.

राज्यात ४० पैकी बीडचे पाच तालुके

समृद्ध गाव स्पर्धेच्या पुढील टप्प्याचे नियोजन सुरू असून, ३८० गुणांची ही स्पर्धा होणार आहे. सहभागी १३४ गावांतील जलमित्र नियोजन करून कामाची तयारी करीत आहेत. राज्यातील ४० पैकी ५ तालुके बीड जिल्ह्यातील आहेत. यात आष्टी, बीड, केज, धारूर, अंबाजोगाईचा समावेश आहे.

गावे समृद्ध होणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या यशानंतर समृद्ध ग्राम स्पर्धा निश्चितच बीड जिल्ह्यातील गावांना समृद्ध बनवेल असा विश्वास पाणी फाऊंडेशन टीमचे संतोष शिनगारे, कैलास पन्हाळकर, झुंबर पिंपळकर, शिवलेश्वर मेदणे, प्रवीण काथवठे, नितीन पाटोळे, महेश गुळभिले यांनी व्यक्त केला.

===Photopath===

140321\img-20210314-wa0184_14.jpg~140321\img-20210314-wa0187_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या कामांमुळे सहभागी गावे समृद्ध होत असून व्हरकटवाडी परिसरातील छायाचित्र