शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

७०० ग्रामीण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : लॉकडाऊनमध्ये व आता शाळा बंद असतानाही शिक्षणात ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : लॉकडाऊनमध्ये व आता शाळा बंद असतानाही शिक्षणात खंड पडू नये म्हणून शांतीलाल मुथा फाऊंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या सहयोगी शिक्षण अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात ३४ ठिकाणी समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियान सुरू आहे. या अभियानातून ७०० विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले, ग्रामीण भागात हे अभियान यापुढेही राबविण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात मोठा खंड पडला. मुलांवर भावनिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी खूप परिणाम झाला. अशास्थितीत योग्य उपाययोजना न आखल्यास त्याचे विपरीत परिणाम मुलांवर होतात व शिक्षणात असलेली रुची कमी होते. यातून शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढते. याचा दूरगामी परिणाम शिक्षणावर होतो. ही स्थिती टाळण्यासाठी सहयोगी शिक्षण अभियान हा उपक्रम समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून शांतीलाल फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात आला. बीड जिल्ह्यात ३४ ठिकाणी समाज विद्या केंद्र सुरू आहेत.

शाळा बंद राहिल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा शासनाने सुरू केली. मात्र, ग्रामीण भागात आजही ५० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणक, इंटरनेट अशा सुविधा नाहीत. या सुविधांअभावी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणूनच गावात समाज विद्या केंद्र सुरू करण्यात आले आहे.

गावचे सरपंच व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातूनच हा उपक्रम सुरू झाला. गावातील एका स्वयंसेवकाला प्रशिक्षण दिल्यानंतर त्या स्वयंसेवकाने गावात विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देणे सुरू केले व या माध्यमातून हे सहयोगी शिक्षण अभियान गतिमान झाले. आगामी काळात बीड जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू होईपर्यंत समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून ही शिक्षणाची चळवळ सुरूच राहणार आहे, अशी माहिती शांतीलाल मुथा फाऊंडेशनचे समन्वयक धनराज सोळंकी यांनी दिली.

२० मुलांचा एक गट

बीड जिल्ह्यात ३४ समाज विद्या केंद्रांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी २० मुलांचा एक गट तयार करून कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांना शिक्षण दिले. मुलांना आनंद मिळेल आणि अभ्यासाची सवय राहील, अशा पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावपातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे विद्यार्थीही शिक्षणात गुंतून राहिले.

चौकट

बीड जिल्ह्यात ३४ समाज विद्या केंद्रांच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियान आजही सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यात १२, बीड - १०, पाटोदा - ३, आष्टी - ४ तर शिरूर कासार - ५ अशी विद्या केंद्र सुरू आहेत.