शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

७०० ग्रामीण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : लॉकडाऊनमध्ये व आता शाळा बंद असतानाही शिक्षणात ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : लॉकडाऊनमध्ये व आता शाळा बंद असतानाही शिक्षणात खंड पडू नये म्हणून शांतीलाल मुथा फाऊंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या सहयोगी शिक्षण अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात ३४ ठिकाणी समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियान सुरू आहे. या अभियानातून ७०० विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले, ग्रामीण भागात हे अभियान यापुढेही राबविण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात मोठा खंड पडला. मुलांवर भावनिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी खूप परिणाम झाला. अशास्थितीत योग्य उपाययोजना न आखल्यास त्याचे विपरीत परिणाम मुलांवर होतात व शिक्षणात असलेली रुची कमी होते. यातून शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढते. याचा दूरगामी परिणाम शिक्षणावर होतो. ही स्थिती टाळण्यासाठी सहयोगी शिक्षण अभियान हा उपक्रम समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून शांतीलाल फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात आला. बीड जिल्ह्यात ३४ ठिकाणी समाज विद्या केंद्र सुरू आहेत.

शाळा बंद राहिल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा शासनाने सुरू केली. मात्र, ग्रामीण भागात आजही ५० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणक, इंटरनेट अशा सुविधा नाहीत. या सुविधांअभावी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणूनच गावात समाज विद्या केंद्र सुरू करण्यात आले आहे.

गावचे सरपंच व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातूनच हा उपक्रम सुरू झाला. गावातील एका स्वयंसेवकाला प्रशिक्षण दिल्यानंतर त्या स्वयंसेवकाने गावात विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देणे सुरू केले व या माध्यमातून हे सहयोगी शिक्षण अभियान गतिमान झाले. आगामी काळात बीड जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू होईपर्यंत समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून ही शिक्षणाची चळवळ सुरूच राहणार आहे, अशी माहिती शांतीलाल मुथा फाऊंडेशनचे समन्वयक धनराज सोळंकी यांनी दिली.

२० मुलांचा एक गट

बीड जिल्ह्यात ३४ समाज विद्या केंद्रांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी २० मुलांचा एक गट तयार करून कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांना शिक्षण दिले. मुलांना आनंद मिळेल आणि अभ्यासाची सवय राहील, अशा पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावपातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे विद्यार्थीही शिक्षणात गुंतून राहिले.

चौकट

बीड जिल्ह्यात ३४ समाज विद्या केंद्रांच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियान आजही सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यात १२, बीड - १०, पाटोदा - ३, आष्टी - ४ तर शिरूर कासार - ५ अशी विद्या केंद्र सुरू आहेत.