शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

७०० ग्रामीण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : लॉकडाऊनमध्ये व आता शाळा बंद असतानाही शिक्षणात ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : लॉकडाऊनमध्ये व आता शाळा बंद असतानाही शिक्षणात खंड पडू नये म्हणून शांतीलाल मुथा फाऊंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या सहयोगी शिक्षण अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात ३४ ठिकाणी समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियान सुरू आहे. या अभियानातून ७०० विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले, ग्रामीण भागात हे अभियान यापुढेही राबविण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात मोठा खंड पडला. मुलांवर भावनिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी खूप परिणाम झाला. अशास्थितीत योग्य उपाययोजना न आखल्यास त्याचे विपरीत परिणाम मुलांवर होतात व शिक्षणात असलेली रुची कमी होते. यातून शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढते. याचा दूरगामी परिणाम शिक्षणावर होतो. ही स्थिती टाळण्यासाठी सहयोगी शिक्षण अभियान हा उपक्रम समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून शांतीलाल फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात आला. बीड जिल्ह्यात ३४ ठिकाणी समाज विद्या केंद्र सुरू आहेत.

शाळा बंद राहिल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा शासनाने सुरू केली. मात्र, ग्रामीण भागात आजही ५० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणक, इंटरनेट अशा सुविधा नाहीत. या सुविधांअभावी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणूनच गावात समाज विद्या केंद्र सुरू करण्यात आले आहे.

गावचे सरपंच व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातूनच हा उपक्रम सुरू झाला. गावातील एका स्वयंसेवकाला प्रशिक्षण दिल्यानंतर त्या स्वयंसेवकाने गावात विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देणे सुरू केले व या माध्यमातून हे सहयोगी शिक्षण अभियान गतिमान झाले. आगामी काळात बीड जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू होईपर्यंत समाज विद्या केंद्राच्या माध्यमातून ही शिक्षणाची चळवळ सुरूच राहणार आहे, अशी माहिती शांतीलाल मुथा फाऊंडेशनचे समन्वयक धनराज सोळंकी यांनी दिली.

२० मुलांचा एक गट

बीड जिल्ह्यात ३४ समाज विद्या केंद्रांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी २० मुलांचा एक गट तयार करून कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांना शिक्षण दिले. मुलांना आनंद मिळेल आणि अभ्यासाची सवय राहील, अशा पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावपातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे विद्यार्थीही शिक्षणात गुंतून राहिले.

चौकट

बीड जिल्ह्यात ३४ समाज विद्या केंद्रांच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियान आजही सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यात १२, बीड - १०, पाटोदा - ३, आष्टी - ४ तर शिरूर कासार - ५ अशी विद्या केंद्र सुरू आहेत.