शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये श्रावणात यंदा ५० लाख नारळांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

अनिल भंडारी बीड : यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने, पोळा साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे नारळाची विक्रीही ...

अनिल भंडारी

बीड : यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने, पोळा साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे नारळाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा जिल्ह्यात आषाढ ते श्रावणात जवळपास ५० लाख नारळांची विक्री झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

पावसाळी हंगाम सुरू झाल्यानंतर, आषाढात पालखी सोहळा, दिंड्या पंढरपूरकडे जातात. यावेळी नारळांना मागणी कमीच असते. यंदा तर पालखी सोहळाही झाला नाही, परंतु श्रावणात सोमवार, व्रत, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, सणावारामुळे नारळची मोठी मागणी असते. यावेळी श्रावणात पाच सोमवार आहेत, तसेच रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पोळा या सण उत्सवांमुळे आणि समाधानकारक पावसामुळे यंदा बीड जिल्ह्यात आषाढ ते श्रावणात जवळपास ५० लाख नारळांची विक्री झाली. सर्जा राजाचा मानाचा सण साजरा करण्यासाठी दोन दिवसांपासून शहरातील दुकानांवर विविध साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

गतवर्षी होता बाजार विस्कळीत

२०१९ मध्ये पोळ्याच्या वेळी दुष्काळी सावट होते, तर २०२० मध्ये कोरोनामुळे बाजारपेठेवर निर्बंध होते. त्यामुळे नारळाचा व्यापार विस्कळीत झाला होता. या संधीचा काही व्यापाऱ्यांनी फायदा घेत १० रुपयांचे नारळ २५ रुपयांपर्यंत विकले होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे.

वाहतूक खर्चात वाढ

तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून नारळाची आवक बीड जिल्ह्यात होते. वाहतूक दरवाढीमुळे शेकडा पन्नास रुपये खर्च वाढला आहे, तर गतवर्षीच्या तुलनेत नारळ विक्रीत जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

पोळ्यासाठी लहान नारळाला मागणी

सध्या ठोक बाजारात लहान नारळाचे भाव १,०५० ते १,१०० रुपये आहे. १२ ते १३ रुपयांना किरकोळ विक्री होते. या नारळाला पोळ्याच्या वेळी जास्त मागणी असते. मध्यम नारळाचे भाव ठोक बाजारात १,२५० ते १,३०० रुपये असून, किरकोळ विक्री १५ रुपये आहे. मोठ्या आकाराचा नारळ १,४०० रुपये शेकडा असून, १८ ते २० रुपयांना विकला जातो.

श्रावणात दोन रुपयांची वाढ

श्रावणाआधी नारळाचे भाव १,१०० ते १,२०० रुपये शेकडा होते. सध्या हे भाव १,३०० ते १,३५० रुपये दरम्यान आहेत.

श्रावणात विविध पर्व आणि सणामुळे मागणी वाढते.

----------

पोळ्याला नारळ चढविणे आणि वाढविल्याशिवाय सण साजरा होत नाही, ही भारतातील शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. शेतात, तसेच म्हसोबा, मारुती, परिसरातील देवता, ग्रामदैवतांचे यावेळी पूजन केले जाते. त्यासाठी मान नारळाचा असतो. या वर्षी आवक चांगली असून, ग्राहकीही उत्तम आहे.

- केदार झंवर, नारळाचे हाेलसेल व्यापारी, बीड.

040921\04_2_bed_5_04092021_14.jpg~040921\04_2_bed_4_04092021_14.jpg

आंध्र प्रदेश, तामिळनाडू भागातून बीड जिल्ह्यात नारळाची मोठी आवक होत आहे. पोळ्यासाठी शेतकरी खरेदी करीत आहेत. ~आंध्र प्रदेश, तामिळनाडू भागातून बीड जिल्ह्यात नारळाची मोठी आवक होत  आहे.