शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘नरेगा’ प्रकरणात ४८० ग्रामसेवकांची होणार विभागीय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST

प्रभात बुडूख/ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्ह्यात २०११ ते २०१९ या वर्षात नरेगामध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशीला आता ...

प्रभात बुडूख/

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : बीड जिल्ह्यात २०११ ते २०१९ या वर्षात नरेगामध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशीला आता वेग आला आहे. उच्च न्यायालयात अहवाल दाखल करायचा असल्याने प्रशासनाने आता कारवाईचे फास आवळायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४८० ग्रामसेवकांची या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

बीड जिल्ह्यात २०११- १९ या काळात नरेगामध्ये झालेल्या कामांच्या चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले होते. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील जवळपास ५०० ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिसीला ग्रामसेवकांनी वेगवेगळी उत्तरे ग्रामसेवकांकडून देण्यात आली होती. मात्र, या उत्तरांची तपासणी केल्यानंतर, जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामसेवकांचे खुलासे अमान्य करण्यात आले होते.

ग्रामसेवकांचे खुलासे अमान्य झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ग्रामसेवकांच्या विरोधात विभागीय चौकशीची कारवाई सुरू केली आहे. यात पुन्हा जिल्ह्यातील ४८० ग्रामसेवकांविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

....

पहिलीच घटना

अशा प्रकारे ग्रामसेवकांच्या विरोधात दोषारोपपत्रे बजावण्यात येत असून, या चौकशीनंतर संबंधितांविरोधात कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रामसेवकांवर विभागीय चौकशी होण्याची कदाचित पहिलीच वेळ आहे. मात्र, या चौकशीअंती कारवाई स्पष्ट होणार आहे.

...

कृषीसह इतर यंत्रणा संभ्रमात

कृषीविभाग, वन विभाग व सामाजिक वनीकरण यासह इतर काही विभागाच्या माध्यमातूनदेखील नरेगाची कामे करण्यात आलेली होती. याचे नियंत्रण तहसीलदार यांच्याकडे होते. नरेगाचे सर्व ऑनलाईन कामकाज असल्यामुळे त्याची तांंत्रिक माहिती या विभागाकडे उपलब्ध नसते. त्यामुळे नेमक्या कोणाला नोटीस बजावायची आणि चौकशी कोणाची सुरू करायची याविषयी कृषी विभागात संभ्रम आहे.

...