शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पक्षांच्या १० उमेदवारांसह ४३ अपक्षांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:51 IST

देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर झालेल्या छानणीत ५३ जणांची उमेदवारी वैध ठरली आहे. या निवडणुकीत सध्या तरी पक्षाचे १० आणि ४३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देबीड लोकसभा : राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा समावेश

बीड : देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर झालेल्या छानणीत ५३ जणांची उमेदवारी वैध ठरली आहे. या निवडणुकीत सध्या तरी पक्षाचे १० आणि ४३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नेहमी चर्चेची राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५ हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम होती. १९ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली.या निवडणुकीत भाजपा, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, हम भारतीय पार्टी, भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, महाराष्टÑ क्रांतीसेना, दलित, शोषित, पिछडा वर्ग अधिकार दल, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया, समाजवादी पार्टी आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी अशा १० पक्षांकडून उमेदवारी दाखल झाली आहे. तर ४३ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन आम्ही पण मैदानात उतरल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे अपक्षांची भाऊगर्दी झाली आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये एका माजी आमदाराचाही समावेश आहे.निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांचे अर्ज आल्याने सामान्य मतदारांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत.वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांच्या यादीतील अनेक अपक्ष उमेदवार हे या आधीच्या अनेक निवडणुकीत आपले भविष्य अजमावणारे आहेत. त्यामुळे अशा हौसी उमेदवारांची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे ४३ पैकी बहुतांश उमेदवार हे ग्रामीण भागातील आहेत. काहींनी प्रचारही सुरू केला असून, आपली उमेदवारी किती महत्वाची आहे हे पटवून देत आहेत. या निवडणुकीत किती अपक्ष उमेदवार रिंगणात तग धरुन राहतात आणि किती माघार घेतात, हे पाहणे शुक्रवारी औत्सुक्याचे ठरणार आहे.आज अंतिम यादी होणार : कोण घेणार उमेदवारी मागे ?होळी आणि धूरवडीमुळे अनेकांनी मुहूर्त टाळला. रंगपंचमीपासून रणसंग्रामाला सुरुवात झाली. २६ मार्चपर्यंत ५८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. २७ मार्च रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी झाली.या छानणीत ५३ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले तर ५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.त्यामुळे हौसेने अर्ज भरलेले किती उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात? हे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होईल.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक