शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पक्षांच्या १० उमेदवारांसह ४३ अपक्षांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:51 IST

देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर झालेल्या छानणीत ५३ जणांची उमेदवारी वैध ठरली आहे. या निवडणुकीत सध्या तरी पक्षाचे १० आणि ४३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देबीड लोकसभा : राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा समावेश

बीड : देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर झालेल्या छानणीत ५३ जणांची उमेदवारी वैध ठरली आहे. या निवडणुकीत सध्या तरी पक्षाचे १० आणि ४३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नेहमी चर्चेची राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५ हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम होती. १९ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली.या निवडणुकीत भाजपा, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, हम भारतीय पार्टी, भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, महाराष्टÑ क्रांतीसेना, दलित, शोषित, पिछडा वर्ग अधिकार दल, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया, समाजवादी पार्टी आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी अशा १० पक्षांकडून उमेदवारी दाखल झाली आहे. तर ४३ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन आम्ही पण मैदानात उतरल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे अपक्षांची भाऊगर्दी झाली आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये एका माजी आमदाराचाही समावेश आहे.निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांचे अर्ज आल्याने सामान्य मतदारांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत.वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांच्या यादीतील अनेक अपक्ष उमेदवार हे या आधीच्या अनेक निवडणुकीत आपले भविष्य अजमावणारे आहेत. त्यामुळे अशा हौसी उमेदवारांची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे ४३ पैकी बहुतांश उमेदवार हे ग्रामीण भागातील आहेत. काहींनी प्रचारही सुरू केला असून, आपली उमेदवारी किती महत्वाची आहे हे पटवून देत आहेत. या निवडणुकीत किती अपक्ष उमेदवार रिंगणात तग धरुन राहतात आणि किती माघार घेतात, हे पाहणे शुक्रवारी औत्सुक्याचे ठरणार आहे.आज अंतिम यादी होणार : कोण घेणार उमेदवारी मागे ?होळी आणि धूरवडीमुळे अनेकांनी मुहूर्त टाळला. रंगपंचमीपासून रणसंग्रामाला सुरुवात झाली. २६ मार्चपर्यंत ५८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. २७ मार्च रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी झाली.या छानणीत ५३ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले तर ५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.त्यामुळे हौसेने अर्ज भरलेले किती उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात? हे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होईल.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक